शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

मूर्तिजापूर तालुक्यात १२ गावात ‘जलसमृद्धी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

संजय उमक मूर्तिजापूर: तालुक्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे हाती घेऊन पूर्णत्वास नेण्यात आली आहे. तालुक्यात ...

संजय उमक

मूर्तिजापूर: तालुक्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे हाती घेऊन पूर्णत्वास नेण्यात आली आहे. तालुक्यात या अभियानांतर्गत ७४ कामे पूर्ण झाली आहे. यामुळे जलपातळी वाढल्याने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने कृषी विभाग, जिल्हा परिषद, वनविभाग व पंचायत समिती यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यास मदत झाली.

सन २०१८-१९ मध्ये तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. यामध्ये धानोरा खुर्द, गणेशपूर, हयातपूर, इसापूर, जितापूर नाकट, मंडुरा, माटोडा, पिशवी, सैदापूर, सिकंदरपूर, सोनाळा, उमरी या १२ गावात अभियान राबवून येथील ढाळीचे बांध, शेततळे सिमेंट नाला बांधकाम, गाळ काढणे, नाला खोलीकरण व सरळीकरण, नाला दुरुस्ती, साखळी सिमेंट क्रॉंक्रीट नाला बांधकाम व रुंदीकरण, खोदतळे, ई क्लास शेततळे, गावतलाव दुरुस्ती. खोल सरळ समतल चर, रिचार्ज शाप्ट, विहीर व बोअरवेल पुनर्भरण आदी कामांचा समावेश असून यासाठी १७ लाख ३१ हजार खर्च करण्यात आला.

----------------

मधापुरी येथील तळे ठरले ‘मॉडल’!

भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने ‘सुजलाम् सुफलाम्’ या अभियानात तालुक्यातील मधापुरी, राजनापूर खिनखिनी, माना, जितापूर खेडकर, कंझरा, खापरवाडा, किनी फनी, या गावात कामे झाली आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. किनी फणी, राजनापूर, खिनखिनी येथे सर्वाधिक काम झाले आहे. मधापुरी येथे मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली असून, येथील तळे ‘मॉडेल’ ठरले आहे. मूर्तिजापूर तालुक्यात प्रशासकीय मंजुरी मिळालेले ७४ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी कामे पूर्ण करण्यासाठी गावाचा एक सर्व्हे करून तेथील गुरे, लोकसंख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आले आहेत. (फोटो)

-----------------

जलयुक्त शिवार अभियान अभियानांतर्गत ही कामे राबवली जातात २०१८-१९ च्या अभियानात ७४ कामे पूर्णत्वास गेली आहेत. यात शेततळे व नाले खोलीकरण महत्त्वाचे ठरले. या कामाचा जलपूर्तीनिर्मिती अहवाल सादर करण्यात आला. गतवर्षी पासून अभियान शासन स्तरावर बंद आहे.

- अमृता काळे,

तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर