शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिन्यांना गळती

By admin | Updated: August 15, 2014 01:41 IST

अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान धरणात केवळ २0 टक्के जलसाठा

अकोला-निम्मा पावसाळा उलटून गेला असून अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान धरणातील जलसाठय़ात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. आजमितीस धरणात केवळ २0 टक्के जलसाठा उपलब्ध असताना शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिन्या, अंतर्गत जलवाहिन्यांसह व्हॉल्वमधून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ह्यलिकेजह्णच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असले तरी नागरिकांना पाणी बचतीचे मुलमंत्र देणार्‍या खुद्द महापालिका प्रशासनाला मात्र स्वत:च्या कर्तव्याचा पुरेपुर विसर पडल्याचे चित्र आहे. प्रशासनाने जलवाहिन्यांच्या गळत्यांवर त्वरीत उपाययोजना न केल्यास, पाणीटंचाईच्या समस्येत अधिकच भर पडणार,हे निश्‍चीत मानल्या जात आहे.मनपातील जलप्रदाय विभागाच्यावतीने महान धरणातून अकोलेकरांना पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पावसामुळे धरणातील जलसाठय़ात १00 टक्के वाढ झाली होती. यंदा मात्र निम्मा पावसाळा उलटून गेला असून पावसाअभावी धरणातील जलाशयात किंचीतही वाढ झाली नाही. आजरोजी धरणातील पाण्यावरील औद्योगिक व सिंचनाचे आरक्षण हटविण्यात आले असले तरी उपलब्ध २0 टक्के जलसाठा लक्षात घेता, ही अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. मध्यंतरी शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याची सबब पुढे करीत मनपा प्रशासनाने पाच दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले. महिन्यातून अकोलेकरांना सहा दिवस पाणीपुरवठा होत असताना त्यामध्ये आणखी कपात होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे अकोलेकरांना पाण्याच्या बचतीचे मुलमंत्र सांगितल्या जात असतानाच दूसरीकडे मुख्य जलवाहिन्यांसह अंतर्गत जलवाहिन्यांना गळत्या लागल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागात रस्त्यावर पाण्याचे लोट पसरल्याचे चित्र असून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. यावर प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. पाईपलाईनचा सर्व्हे अधांतरीशहरातील जलवाहिन्या दुरुस्तीची कामे नगरसेवकांच्या अखत्यारित असलेल्या खासगी कंत्राटदारांमार्फत केल्या जातात. मात्र पाईप लाईन दुरुस्तीचा दर्जाच नसल्याने वारंवार गळत्या लागतात. उन्हाळय़ात पाणीपुरवठय़ाच्या नियोजनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते; परंतु जलवाहिन्यांना सर्वाधिक गळती उन्हाळय़ातच लागत असल्याचे दिसून येते. जमिनीच्या खाली दर्जाहिन पाईप वापरून पुन्हा त्याच पाईप लाईनची कामे प्रस्तावित करण्याची प्रथा गत बारा वर्षांपासून सुरू आहे. यावर सत्तापक्ष भारिप-बमसंच्यावतीने ऑक्टोबर २0१३ मध्ये पाईप लाईनचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला होता. हा सर्व्हे अद्यापही अधांतरी असल्यामुळे खिसे भरणार्‍यांचे चांगलेच फावत आहे.