शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर येथे जलवाहिनीला गळती; दूषित पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST

मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय ...

मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीत सांडपाणी जात असल्याने शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे न.प.चे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ गळती थांबविण्याची मागणी होत आहे.

नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गोयंकानगर येथे गत काही वर्षांपासून गळती लागलेली आहे. परिसरात खड्डा निर्माण झाल्याने या खड्ड्यात घाण पाणी साचत आहे. तसेच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यास खड्ड्यातील घाण पाणी जलवाहिनीत शिरत असल्याचे चित्र आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, गत वर्षभरापासून परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचा आरोप नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी केला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर जलवाहिनीला लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाणी खड्ड्यात साचत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच घाण पाणी जलवाहिनीत जात असल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोरोनाच्या संकटात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कार्यवाही करून मुख्य जलवाहिनीची गळती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिली आहे.(फोटो)

------------------------------------

मूर्तिजापूर नगरपालिकेद्वारा नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गोयंकानगर येथील त्वरित लिकेज बंद करावे, तसेच शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनीची दुरुस्ती करावी.

-द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक, मूर्तिजापूर.