शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर येथे जलवाहिनीला गळती; दूषित पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST

मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय ...

मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीत सांडपाणी जात असल्याने शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे न.प.चे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ गळती थांबविण्याची मागणी होत आहे.

नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गोयंकानगर येथे गत काही वर्षांपासून गळती लागलेली आहे. परिसरात खड्डा निर्माण झाल्याने या खड्ड्यात घाण पाणी साचत आहे. तसेच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यास खड्ड्यातील घाण पाणी जलवाहिनीत शिरत असल्याचे चित्र आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, गत वर्षभरापासून परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचा आरोप नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी केला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर जलवाहिनीला लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाणी खड्ड्यात साचत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच घाण पाणी जलवाहिनीत जात असल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोरोनाच्या संकटात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कार्यवाही करून मुख्य जलवाहिनीची गळती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिली आहे.(फोटो)

------------------------------------

मूर्तिजापूर नगरपालिकेद्वारा नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गोयंकानगर येथील त्वरित लिकेज बंद करावे, तसेच शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनीची दुरुस्ती करावी.

-द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक, मूर्तिजापूर.