शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

मूर्तिजापूर येथे जलवाहिनीला गळती; दूषित पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST

मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय ...

मूर्तिजापूर : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. गोयंकानगर येथे मुख्य जलवाहिला गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीत सांडपाणी जात असल्याने शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे न.प.चे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ गळती थांबविण्याची मागणी होत आहे.

नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गोयंकानगर येथे गत काही वर्षांपासून गळती लागलेली आहे. परिसरात खड्डा निर्माण झाल्याने या खड्ड्यात घाण पाणी साचत आहे. तसेच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यास खड्ड्यातील घाण पाणी जलवाहिनीत शिरत असल्याचे चित्र आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, गत वर्षभरापासून परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचा आरोप नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी केला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा सुरू केल्यानंतर जलवाहिनीला लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाणी खड्ड्यात साचत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच घाण पाणी जलवाहिनीत जात असल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोरोनाच्या संकटात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कार्यवाही करून मुख्य जलवाहिनीची गळती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिली आहे.(फोटो)

------------------------------------

मूर्तिजापूर नगरपालिकेद्वारा नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गोयंकानगर येथील त्वरित लिकेज बंद करावे, तसेच शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनीची दुरुस्ती करावी.

-द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक, मूर्तिजापूर.