शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी करून राजनखेड शिवारातील वृक्षांना दिले जातेय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST

धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत राजनखेड शिवारात भूमापन क्र. ११ चे पोटखराबा क्षेत्र ०.४० हेक्टर, भूमापन क्र. ८ चे ३.४४ ...

धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत राजनखेड शिवारात भूमापन क्र. ११ चे पोटखराबा क्षेत्र ०.४० हेक्टर, भूमापन क्र. ८ चे ३.४४ हेक्टर, भूमापन क्र. १ चे १.४७ हेक्टर क्षेत्र ईक्लास झाला आहे. भूमापन क्र. ५ चे क्षेत्र ७.७९ हेक्टर हे वनविभागाचे आहे. या क्षेत्रामध्ये सामाजिक वनीकरण विभागाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांचे संगोपन सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात येते. या वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकरऐवजी विहिरीमध्ये मोटारपंप बसवून आणि त्यासाठी रीतसर विद्युत कनेक्शन न घेता, विद्युत खांबावर आकडा टाकून वीज चोरी करून वृक्षांना पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात येत आहे. राजनखेड गाव व तांड्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतच्या दोन विहिरींपैकी एका विहिरीत मोटारपंप टाकून व विजेची चोरी करून वृक्षांना पाणी देण्यात येत आहे.

एका तासात पाइपलाइन काढून प्रकरण सावरण्याचा प्रयत्न

वीज चोरी करून वृक्षांना पाणी देण्याचा सामाजिक वनीकरण विभागाचा प्रताप समोर आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका तासात टाकलेली पाइपलाइन काढून घेतली. एवढेच नाहीतर, वीज खांबावरील आकडासुद्धा काढण्यात आला. हे प्रकरण सावरण्यासाठी संबंधित विभागाने आटोकाट प्रयत्न केले.

पाणी देण्यासाठी खोटी देयके काढण्याचा प्रयत्न

वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकर किंवा मजुरांचा वापर करून खोटी देयके काढण्याचा प्रयत्न यामागे असावा, अशी चर्चा या वेळी आहे. विद्युत खांबावर आकडा टाकून वीज चोरी करून पाइपलाइनद्वारे वृक्षांना पाणी देण्याचा प्रयोग सुरू होता. कागदोपत्री टँकर व मजुरांद्वारे पाणी देण्यात येत असल्याचे भासवून त्याची देयके काढण्याचा प्रकार तर यामागे नसावा अशी शंका उपस्थित होत आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

झालेला प्रकार गंभीर आहे. या प्रकाराबाबत संबंधितांकडून माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल.

- विजय माने, उपविभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण

ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आहेत. सामाजिक वनीकरण विभागाला पाणी देण्यासाठी ठराव घेतला नाही तसेच लेखी मंजुरीसुद्धा दिली नाही.

- मनोज गवई, ग्रामसेवक राजनखेड