शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

२७५ एकर जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

By admin | Updated: July 13, 2017 01:06 IST

पारस प्रकल्प : विस्तारीकरणाला ब्रेक लागल्याने शेतकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पारस औष्णिक वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीने गावातील शेतकऱ्यांची ११०.९२ हेक्टर (२७५ एकर) जमीन संपादित केल्यानंतर आता शासनाने वीज निर्मिती प्रकल्पाच्या निर्मितीपासून हात वर केले आहेत. शेतकऱ्यांचा आधीच विरोध असताना जमीन संपादित झाली आहे. ती परत करण्याची मागणी आता शेतकरी करणार आहेत. पारस वीज निर्मिती केंद्राच्या विस्तारासाठी २००७ मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. वीज निर्मिती कंपनीच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आधी प्रकल्पासाठी १३२.७० हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी प्रस्तावातून २१.७८ हेक्टर जमीन कमी करून ११०.९२ हेक्टरचे संपादन करण्याला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी वीज निर्मिती कंपनीने महसूल विभागाला १ कोटी ८ लाख रुपये अदाही केले. त्यानंतर जमिनीच्या मोबदल्यासाठी ८ कोटी ५७ लाख ५१ हजार रुपये भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा केले. त्यानुसार जमीन संपादनाचा अंतिम निवाडा १६ जून २०११ रोजी करण्यात आला. त्यानंतर काही शेतकऱ्यांची प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. न्यायालयाने सार्वजनिक हितासाठी जमीन संपादनाचे आदेश दिले. त्यानुसार संपूर्ण जमिनीचे संपादन झाले. आता मात्र राज्याला विजेची गरज नसल्याचे सांगत पारस प्रकल्पाचे विस्तारीकरण न करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी स्पष्ट केले.त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. आता पारस औष्णिक विद्युत प्रकल्प संघर्ष समितीची स्थापना करून जनआंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचे शासनाला सवाल- भौतिक सुविधा उपलब्ध नसताना परळी, कोराडी येथे नवीन संच उभारणी केली, आम्हाला गाजर का?- नवीन संच उभारणीसाठी संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करा.- धरणातील पाणी सिंचनासाठी उपसा करण्याच्या परवानग्या देऊन विद्युत जोडण्या द्या. - प्रकल्पग्रस्तांनाही झुलवण्याचे काम होत आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.