शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

राखमिश्रीत दूषित पाणी धरणातून नदीत

By admin | Updated: January 7, 2015 01:24 IST

अकोला जिल्ह्यातील पारस वीज निर्मिती प्रकल्पातील प्रकार, पाण्याच्या रासायनिक तपासणीत आढळल्या गंभीर बाबी.

विवेक चांदूरकर /अकोला: पारस येथील वीज निर्मिती प्रकल्पात तयार होणारी ज्वलनशील राख, १६ कोटी रुपये खचरून बांधलेल्या अँश पाँडमध्ये सोडण्याऐवजी, मन नदीवरील धरणात सोडण्यात येत आहे. रसायनयुक्त राखेमुळे ३0 ते ४0 गावांना पाणीपुरवठा करणार्‍या या धरणाचे पाणी दूषित होत असून, हे पाणी नागरिकच नव्हे तर प्राण्यांसाठीही घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाळापूर तालुक्यातील पारस येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात दररोज शेकडो टन राख जमा होते. ही राख एका पाईपद्वारे कोळासा परिसरातील मोठय़ा भूखंडावर द्रव रूपात जमा केली जाते. द्रवरूपात असलेली ही राख या ठिकाणी गोळा करून, त्यातील पाणी वेगळे केले जाते. त्यानंतर उरलेल्या राखेची विक्री केली जाते. पाणी वेगळे करून राख साठविण्याकरिता १६ कोटी रुपयांचा अँश पाँड प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. त्या अँश पाँडपर्यंंत पाईपलाइनद्वारे राख पोहोचविण्याकरिता मनारखेडमध्ये पंप हाऊस बांधण्यात आले आहे; मात्र वीज निर्मिती प्रकल्पातून निघालेली राख अँशपाँडपर्यंत पोहोचतच नाही. हे राखमिश्रीत दूषित पाणी पंप हाऊसजवळून एका नालीद्वारे थेट मन नदीवर बांधलेल्या धरणात सोडण्यात येते. त्यामुळे धरणाच्या काठावर सर्वत्र राख साचलेली आहे. या धरणातील पाणी नदीत जाते व नदीतील पाणी परिसरातील मनारखेड, कोळासा, मांडोली, कसुरा, कळंबी, सोनगिरी, हिंगणा व लोहारा या गावांना पुरविले जाते. राखेचे दूषित पाणी धरणात सोडले जात असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात जल प्रदूषण होत आहे.

         लोकमतने या पाण्याची तपासणी केली असता, पाण्यामध्ये आवश्यकतेपेक्षा ३00 पटीने जास्त गढूळता, २0 पटीने जास्त लोहाचे प्रमाण आढळले आहे. गढूळ व लोहयुक्त पाणी मनुष्याने पिले, तर त्याचा सरळ परिणाम पंचनसंस्थेवर होतो. कालांतराने त्याचे गंभीर आजारात रूपांतर होत असल्याचे डॉ. दीपक मोरे यांनी सांगितले. डायरिया आणि उलट्यांसारखे आजारही या पाण्यामुळे होतात, असे त्यांनी सांगितले. गत दहा महिन्यांपासून राखमिश्रीत पाणी धरणात सोडले जात आहे. या भागात जाण्यास मज्जाव असल्याने, या गंभीर प्रकाराकडे कुणाचेही लक्ष जात नाही.

*धरणातील जैवविविधता धोक्यात

         धरणातील पाण्यामध्ये मासे, प्लवंग, किड तसेच विविध जातीच्या झाडांसह विपूल जैवविविधता असते. कोट्यवधी जीव पाण्यावर जगत असतात. पारस येथे राखेचे दूषित पाणी धरणात सोडल्याने काठावर राखेचे ढीग साचले आहेत. या प्रदुषणामुळे धरणातील मासे कधीचेच नष्ट झाले आहेत. छोट्या-मोठय़ा किड्यांसह एकूणच जैवविविधता यामुळे धोक्यात आली आहे. दरम्यान डॉ दीपक मोरे यांनी पाण्यामध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जर गढूळता व लोहाचे प्रमाण असेल तर पाणी पिणार्‍या नागरिकांना डायरिया, उलट्यांचा आजार होऊ शकतो. तसेच जास्त प्रमाणात लोहाचे प्रमाण असले तर पंचनसंस्था बिघडते व त्यातून विविध आजार होण्याची भीती व्यक्त केली.

        यासंबंधी पारस वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता रर्वीद्र गोहणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अँश पॉन्डमध्ये पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत बिघाड असल्यामुळे धरणामध्ये तात्पुरती व्यवस्था करण्याकरिता हे पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगीतले. या धरणातून कोणत्याही ठिकाणी पिण्याचे पाणी जात नाही. त्यामुळे कुणालाही धोका नाही. धरण आमचे आहे, आम्हाला त्यात पाणी सोडण्यापासून काहीच हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ,सामाजिक कार्यकर्ता रामलाल तायडे यांनी प्रकल्पातील दूषित पाणी अँश पाँडमध्ये सोडण्यासाठी पंप हाऊस बांधण्यात आले आहे. हे पंप हाऊस चालविण्याकरिता महिन्याला अडीच लाख रूपयांची देयके काढली जातात. पाणी अँश पाँडऐवजी धरणात जात असेल, तर अडीच लाख रुपयांची देयके कशासाठी काढली जातात, हा प्रश्न उपस्थित केला.