शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

पाणी संवर्धनच तारणार - शेळके

By admin | Updated: July 9, 2017 09:29 IST

इंडियन वॉटर असोसिएशनची अकोल्यात स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणी बहुमोल असून, पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. भविष्यात येणार्‍या पिढीसाठी पाण्याचे जतन करावे लागणार आहे, अन्यथा पाण्यासाठी युद्धाला सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरू ण शेळके यांनी शनिवारी येथे केले.अकोल्यात इंडियन वॉटर वर्क (आयवा)असोसिएशनची ३३ वी शाखा स्थापन करण्यात आली. त्यानिमित्त बाभूळगाव येथील श्री.शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरू न बोलत होते. कार्यक्रमाला श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, आयवाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तांत्रिक संचालक डॉ. हेमंत लांडगे, श्री. शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता एस.बॅनर्जी, मजीप्राचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके अकोला, अजय मालोकार आदींची उपस्थिती होती. अँड. शेळके यांनी पाण्याचे महत्त्व समजावून सांगताना, इंडियन वॉटर वर्क असोसिएशनची अकोला येथे शाखा स्थापन झाल्याने, या भागातील जनतेला पाण्यासंबंधी या संस्थेला लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तद्वतच या संस्थेच्या अभियंत्यांनी नवे संशोधन करू न नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच तंत्रज्ञान समजावून सांगावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली. डॉ. गुप्ता यांनीही पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. डॉ.लांडगे यांनी शाश्‍वत पाण्याच्या स्रोतावर विचार मांडले. भविष्यातील पिढीची गरज ओळखून आतापासूनच आपण पाण्याचा काटेकोर वापर करणे अनिवार्य असल्याचे ते म्हणाले. ५0 वर्षे आधी नदी, नाले तुडुंब भरलेले असायचे. बारमाही पाण्याची उपलब्धता होती. आज त्याच नदी, नाल्यांची गटारे झाली आहेत. हाच वारसा आजच्या आपल्या पिढीपुढे आहे. आपणही तोच वारसा भविष्यात ठेवायचा का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, येथे पाणी या विषयावर उपस्थित तज्ज्ञांनी पडद्यावर सादरीकरण केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र व इतर राज्यातील तज्ज्ञांची उपस्थिती होती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.