शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकट आणखी भीषण!

By admin | Updated: April 29, 2016 02:06 IST

अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील केवळ ४.८९ दलघमी जलसाठा.

राजरत्न सिरसाट /अकोलाअकोला शहराची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात मागील वर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने, यावर्षी एप्रिल महिन्यातच या धरणातील जलसाठय़ाने तळ गाठला. यामुळे अकोलेकरांवरील जलसंकट वाढले आहे. काटेपूर्णा धरणात आजमितीस केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक असून, यावर्षी याच धरणातून दोन दशलक्ष घनमीटर जलसाठा खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा १५ जूनपर्यंत अकोलेकरांची तहान भागवणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर्षी उन्हाळा प्रखर असून, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग दररोज १२ ते १५ मि.मी. एवढा आहे. ग्रामीण भागातील जनतेची पाण्याविना होणारी होरपळ बघता, जिल्हा प्रशासनाने काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सांयकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा- उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा १८ किलोमीटरचा प्रवास असून, ४३ ते ४५ अंश तापमानामुळे नदीपात्र कोरडेठण्ण पडल्याने पात्रातच मोठय़ा प्रमाणात पाणी मुरत आहे.परिणामी गुरुवारी सांयकाळपर्यंत २४ तास उलटूनही केवळ अर्धे म्हणजे नऊ किलोमीटर अंतरापर्यंतच पाणी पोहोचले होते. हे पाणी पुढे येण्यासाठी आणखी २४ ते ३0 तास लागण्याची शक्यता आहे. या पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी धरणातून आणखी एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे लागणार असल्याचे वृत्त आहे. असे केल्यास काटेपूर्णात केवळ ३.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक असेल. अकोलेकरांना दररोज लागणार्‍या पाण्याची गरज बघता, या साठय़ात १५ जूनपर्यंत त्यांची तहान भागवणे अशक्य आहे.