शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जलसंकट आणखी भीषण!

By admin | Updated: April 29, 2016 02:06 IST

अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील केवळ ४.८९ दलघमी जलसाठा.

राजरत्न सिरसाट /अकोलाअकोला शहराची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात मागील वर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने, यावर्षी एप्रिल महिन्यातच या धरणातील जलसाठय़ाने तळ गाठला. यामुळे अकोलेकरांवरील जलसंकट वाढले आहे. काटेपूर्णा धरणात आजमितीस केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक असून, यावर्षी याच धरणातून दोन दशलक्ष घनमीटर जलसाठा खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा १५ जूनपर्यंत अकोलेकरांची तहान भागवणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर्षी उन्हाळा प्रखर असून, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग दररोज १२ ते १५ मि.मी. एवढा आहे. ग्रामीण भागातील जनतेची पाण्याविना होणारी होरपळ बघता, जिल्हा प्रशासनाने काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सांयकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा- उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा १८ किलोमीटरचा प्रवास असून, ४३ ते ४५ अंश तापमानामुळे नदीपात्र कोरडेठण्ण पडल्याने पात्रातच मोठय़ा प्रमाणात पाणी मुरत आहे.परिणामी गुरुवारी सांयकाळपर्यंत २४ तास उलटूनही केवळ अर्धे म्हणजे नऊ किलोमीटर अंतरापर्यंतच पाणी पोहोचले होते. हे पाणी पुढे येण्यासाठी आणखी २४ ते ३0 तास लागण्याची शक्यता आहे. या पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी धरणातून आणखी एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे लागणार असल्याचे वृत्त आहे. असे केल्यास काटेपूर्णात केवळ ३.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक असेल. अकोलेकरांना दररोज लागणार्‍या पाण्याची गरज बघता, या साठय़ात १५ जूनपर्यंत त्यांची तहान भागवणे अशक्य आहे.