शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

जलसंकट आणखी भीषण!

By admin | Updated: April 29, 2016 02:06 IST

अकोल्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील केवळ ४.८९ दलघमी जलसाठा.

राजरत्न सिरसाट /अकोलाअकोला शहराची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात मागील वर्षी पूरक जलसाठा संचयित झाला नसल्याने, यावर्षी एप्रिल महिन्यातच या धरणातील जलसाठय़ाने तळ गाठला. यामुळे अकोलेकरांवरील जलसंकट वाढले आहे. काटेपूर्णा धरणात आजमितीस केवळ ६.८९ दशलक्ष घनमीटर (७.९७ टक्के) जलसाठा शिल्लक असून, यावर्षी याच धरणातून दोन दशलक्ष घनमीटर जलसाठा खांबोरा-उन्नई बंधार्‍यासाठी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे ४.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा १५ जूनपर्यंत अकोलेकरांची तहान भागवणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर्षी उन्हाळा प्रखर असून, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग दररोज १२ ते १५ मि.मी. एवढा आहे. ग्रामीण भागातील जनतेची पाण्याविना होणारी होरपळ बघता, जिल्हा प्रशासनाने काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सांयकाळी ६ वाजता या धरणातून खांबोरा- उन्नई बंधार्‍यासाठी दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा १८ किलोमीटरचा प्रवास असून, ४३ ते ४५ अंश तापमानामुळे नदीपात्र कोरडेठण्ण पडल्याने पात्रातच मोठय़ा प्रमाणात पाणी मुरत आहे.परिणामी गुरुवारी सांयकाळपर्यंत २४ तास उलटूनही केवळ अर्धे म्हणजे नऊ किलोमीटर अंतरापर्यंतच पाणी पोहोचले होते. हे पाणी पुढे येण्यासाठी आणखी २४ ते ३0 तास लागण्याची शक्यता आहे. या पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी धरणातून आणखी एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे लागणार असल्याचे वृत्त आहे. असे केल्यास काटेपूर्णात केवळ ३.८९ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक असेल. अकोलेकरांना दररोज लागणार्‍या पाण्याची गरज बघता, या साठय़ात १५ जूनपर्यंत त्यांची तहान भागवणे अशक्य आहे.