शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

शेतात पाणी अन् चिखल; पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बसरला असून, चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २२ ...

जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बसरला असून, चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २२ जुलै रोजी जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतातील पिके पाण्याखाली गेली. नदी व नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेली असून, शेतात पावसाचे पाणी शिरल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे; परंतु नदी व नाल्यांना आलेला पूर ओसरत असला तरी, शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी आणि रस्त्यांसह शेतांमध्ये चिखल असल्याने, पिकांचे पंचनामे करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे करता येणार आहेत. त्यानुषंगाने पीक नुकसानीसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत. शेतात पावसाचे पाणी साचले असून, चिखल असल्याने पंचनामे करण्यासाठी शेताच्या नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचता येत नाही. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचून पीक नुकसानीचे पंचनामे करता येतील.

शिवाजीराव भरणे

शेतकरी, रामगाव

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमीन नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी कमी झाल्यानंतर आणि नुकसानग्रस्त शेतापर्यंत पोहोचणे शक्य असलेल्या शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी