शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पाणी अन् चिखल; पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बसरला असून, चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २२ ...

जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बसरला असून, चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २२ जुलै रोजी जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतातील पिके पाण्याखाली गेली. नदी व नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेली असून, शेतात पावसाचे पाणी शिरल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे; परंतु नदी व नाल्यांना आलेला पूर ओसरत असला तरी, शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी आणि रस्त्यांसह शेतांमध्ये चिखल असल्याने, पिकांचे पंचनामे करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे करता येणार आहेत. त्यानुषंगाने पीक नुकसानीसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत. शेतात पावसाचे पाणी साचले असून, चिखल असल्याने पंचनामे करण्यासाठी शेताच्या नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचता येत नाही. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचून पीक नुकसानीचे पंचनामे करता येतील.

शिवाजीराव भरणे

शेतकरी, रामगाव

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमीन नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी कमी झाल्यानंतर आणि नुकसानग्रस्त शेतापर्यंत पोहोचणे शक्य असलेल्या शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी