शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

शेतात पाणी अन् चिखल; पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बसरला असून, चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २२ ...

जिल्ह्यात बुधवार, २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बसरला असून, चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे २२ जुलै रोजी जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतातील पिके पाण्याखाली गेली. नदी व नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेली असून, शेतात पावसाचे पाणी शिरल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे; परंतु नदी व नाल्यांना आलेला पूर ओसरत असला तरी, शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी आणि रस्त्यांसह शेतांमध्ये चिखल असल्याने, पिकांचे पंचनामे करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे करता येणार आहेत. त्यानुषंगाने पीक नुकसानीसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत. शेतात पावसाचे पाणी साचले असून, चिखल असल्याने पंचनामे करण्यासाठी शेताच्या नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचता येत नाही. पावसाने उघडीप दिल्यास दोन दिवसांनंतर नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचून पीक नुकसानीचे पंचनामे करता येतील.

शिवाजीराव भरणे

शेतकरी, रामगाव

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमीन नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात शेतांमध्ये साचलेले पावसाचे पाणी कमी झाल्यानंतर आणि नुकसानग्रस्त शेतापर्यंत पोहोचणे शक्य असलेल्या शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी