शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचा ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:49 IST

अकोला : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर महसूल विभागातील ७0 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक सोमवारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचे लक्ष (वॉच) राहणार आहे.

ठळक मुद्दे७0 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर महसूल विभागातील ७0 अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक सोमवारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचे लक्ष (वॉच) राहणार आहे.अकोला शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील ११ झोनमध्ये  महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, अन्न-धान्य वितरण अधिकारी रमेश पवार, तहसीलदार पी.यू. गिरी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून व तलाठी इत्यादी संवर्गातील ६५ अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे गणेश विसर्जन मिरवणुकीवर नियंत्रण राहणार असून, संपूर्ण मिरवणूक मार्गावर अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांचे नियंत्रण राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या नियंत्रणात कक्ष कार्यान्वित राहणार आहे.

रंगरंगोटी कशासाठी?निमवाडी परिसरात नदीपात्र दूषित झाले आहे. तरी सुद्धा याठिकाणी पायर्‍यांची रंगरंगोटी करण्यात आली. नदीपात्रात घातक रसायन असून, पाण्यात उतरणेही आरोग्यासाठी घातक आहे. अशावेळी भक्तिभावात दंग होणार्‍या गणेश भक्तांनी दूषित पाण्यात गणेश विसर्जन करायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

चार ठिकाणं संवेदनशीलगणेश विसर्जन मिरवणुकीत ५0 मंडळं सहभागी होण्याची शक्यता आहे. मिरवणूक मार्गावरील चार ठिकाणं संवेदनशील आहेत. यामध्ये जामा मस्जीद (अलका बॅटरी), माळीपुरा चौक, जामा मस्जीद (तेलीपुरा चौक) व कच्छी मस्जीद (ताजना पेठ) या ठिकाणांचा समावेश आहे.