शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अकोला शहरात ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी; मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:18 IST

जलवाहिनींच्या कामाला अकोलेकरांचा आक्षेप नसला तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी रोखण्यासाठी मनपाकडून तातडीने उपाययोजना होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अकोला: रस्त्याचे खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र मंगळवारी रयत हवेलीसमोर दिसून आले. दुसरीकडे शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम वेगात सुरू असतानाच जुने शहरातील शिवाजी नगर परिसरातील वाल्मीकी चौकात ‘एचडीपी’ पाइपचा जॉइंट उखडल्यामुळे डाबकी रोड भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. रस्ते असो वा जलवाहिनींच्या कामाला अकोलेकरांचा आक्षेप नसला तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी रोखण्यासाठी मनपाकडून तातडीने उपाययोजना होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.शहरात सर्वत्र प्रशस्त रस्त्यांचे निर्माण केले जात आहे. त्यासाठी खोदकाम केले जात असतानाच जमिनीखालील जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे चित्र आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असून, जलवाहिन्यांची दुरुस्ती केली जात आहे. यादरम्यान जलवाहिनी लिकेज होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने त्या-त्या भागातील पाणी पुरवठा तातडीने खंडित करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तातडीने उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.महान धरणात अवघा २८ टक्के जलसाठाशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात आज रोजी अवघा २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाची दाहकता वाढत असल्याने पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला पाणी पुरवठ्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार असून, अक ोलेकरांनासुद्धा पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.अकोलेकरांनो, पाणी शिळे होत नाही!महान धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता आगामी दिवसांत मनपाला पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. अशावेळी दोन-दोन दिवस साठवून ठेवलेले पाणी शिळे झाल्याच्या भ्रामक समजुतीपायी अकोलेकर फेकून देतात. पाणी कधीही शिळे होत नसते, याबद्दल मनपाला जनजागृती करावी लागेल, हे निश्चित.गुडधीमध्ये फुटली जलवाहिनीमोठी उमरी ते गुडधीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. खोदकामादरम्यान विविध ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी रात्री गुडधी परिसरात जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र दिसून आले. या प्रकाराकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका