शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

कचऱ्यावर प्रक्रिया; मुंबईच्या कंपनीसोबत चर्चा

By admin | Updated: April 21, 2017 02:04 IST

कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी अंमलबजावणीची गरज

अकोला : शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने शहराचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करणे नितांत गरजेचे झाले असून, यासंदर्भात मुंबई येथील कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून जमा केलेला कचरा, घाण नायगाव येथील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर साठवला जातो. साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे कचऱ्याच्या समस्येने अकोलेकरांसह महापालिकेची डोकेदुखी वाढवली आहे. सद्यस्थितीत नायगावातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले असून, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे हाच मनपासमोर एकमेव उपाय शिल्लक आहे.त्या पृष्ठभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी मनपात येऊन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांची भेट घेतली. त्यावेळी कचऱ्याच्या समस्येवर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. अतिक्रमण कधी हटवणार?नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडला अतिक्रमकांनी विळखा घातला आहे. दिवसेंदिवस ही जागा अतिक्रमकांच्या ताब्यात जात असल्याने संबंधितांना हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची गरज आहे. पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांना हाताशी धरून संबंधित अतिक्रमक मनपाच्या घंटागाडीवरील वाहनचालकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करीत असल्याचे समोर येते. तरीदेखील अतिक्रमकांना हुसकावून लावल्या जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.--