शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावर प्रक्रिया; मुंबईच्या कंपनीसोबत चर्चा

By admin | Updated: April 21, 2017 02:04 IST

कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी अंमलबजावणीची गरज

अकोला : शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने शहराचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करणे नितांत गरजेचे झाले असून, यासंदर्भात मुंबई येथील कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून जमा केलेला कचरा, घाण नायगाव येथील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर साठवला जातो. साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे कचऱ्याच्या समस्येने अकोलेकरांसह महापालिकेची डोकेदुखी वाढवली आहे. सद्यस्थितीत नायगावातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले असून, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे हाच मनपासमोर एकमेव उपाय शिल्लक आहे.त्या पृष्ठभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी मनपात येऊन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांची भेट घेतली. त्यावेळी कचऱ्याच्या समस्येवर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. अतिक्रमण कधी हटवणार?नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडला अतिक्रमकांनी विळखा घातला आहे. दिवसेंदिवस ही जागा अतिक्रमकांच्या ताब्यात जात असल्याने संबंधितांना हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची गरज आहे. पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांना हाताशी धरून संबंधित अतिक्रमक मनपाच्या घंटागाडीवरील वाहनचालकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करीत असल्याचे समोर येते. तरीदेखील अतिक्रमकांना हुसकावून लावल्या जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.--