शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

कचऱ्यावर प्रक्रिया; मुंबईच्या कंपनीसोबत चर्चा

By admin | Updated: April 21, 2017 02:04 IST

कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी अंमलबजावणीची गरज

अकोला : शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने शहराचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करणे नितांत गरजेचे झाले असून, यासंदर्भात मुंबई येथील कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून जमा केलेला कचरा, घाण नायगाव येथील महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या ‘डम्पिंग ग्राउंड’वर साठवला जातो. साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे कचऱ्याच्या समस्येने अकोलेकरांसह महापालिकेची डोकेदुखी वाढवली आहे. सद्यस्थितीत नायगावातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नाही. या भागातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले असून, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे हाच मनपासमोर एकमेव उपाय शिल्लक आहे.त्या पृष्ठभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी मनपात येऊन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांची भेट घेतली. त्यावेळी कचऱ्याच्या समस्येवर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. अतिक्रमण कधी हटवणार?नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडला अतिक्रमकांनी विळखा घातला आहे. दिवसेंदिवस ही जागा अतिक्रमकांच्या ताब्यात जात असल्याने संबंधितांना हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची गरज आहे. पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांना हाताशी धरून संबंधित अतिक्रमक मनपाच्या घंटागाडीवरील वाहनचालकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करीत असल्याचे समोर येते. तरीदेखील अतिक्रमकांना हुसकावून लावल्या जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होतात.--