शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वारकरी सेना राबविणार ‘माझी वारी माझी जबाबदारी’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

अकाेला : काेराेनाचे संकट आता कमी झाले असून अनेक जिल्हयांमधील लाॅकडाऊन पूर्णपणे खुले झाले आहे. अशा स्थितीत आषाढी वारीसाठी ...

अकाेला : काेराेनाचे संकट आता कमी झाले असून अनेक जिल्हयांमधील लाॅकडाऊन पूर्णपणे खुले झाले आहे. अशा स्थितीत आषाढी वारीसाठी परवानगी द्यावी या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले असून वारकरीही आक्रमक झाले आहेत. ९ वारकरी संघटनांनी एकत्रित येत ‘माझी वारी माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले असून या अभियानात १०० वारकरी वारी करतील असा दावा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी केला आहे.

विश्व वारकरी सेनेचे हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप गणेश महाराज शेटे, अखिल वारकरी भाविक मंडळाचे हभप सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय भागवत धर्म परिषदचे हभप चिंतामणी महाराज परभणीकर, हभप योगेश महाराज सातारकर, पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधक नांदेडचे हभप सदाशिव महाराज पवळे, वारकरी सेवा फाऊंडेशन हभप पांडुरंग महाराज शितोळे, अखिल विश्व वारकरी परिषद हभप नितीन महाराज सातपुते, वारकरी युवक संघाचे हभप संतोष महाराज काळे, हिंदू रक्षक धर्म परिषदचे हभप दत्ता महाराज गांगरे, हभप महादेव पाटील गायकवाड, हभप योगेश महाराज शिंदे आदींनी वारीसाठी पुढाकार घेतला आहे. या अभियानासाठी वारकऱ्यांनी नियमही तयार केले आहेत.

असे आहेत नियम

वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांनी काेराेना चाचणी करावी, निगेटिव्ह अहवाल साेबत ठेवावा.

वारीत सहभागी वारकऱ्याचे वय ६० वर्षांच्या आत असावे.

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्ससह कोरोना संबंधित सर्व नियम पाळावे लागतील.

दिंडी सोहळ्यामध्ये वारकरी संघटनेमधील पदाधिकारी सहभागी हाेतील.

दिंडीसोबत कुठल्याही संतांच्या पादुका राहणार नाहीत. मात्र, अधिष्ठान म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी व पंचमवेद गाथा राहतील.

प्रत्येक सहभागी वारकऱ्याला ओळखपत्र दिले जाणार आहे.

काेट