शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सर्वधर्म समभाव, व्यापक विचारसरणीचा वारकरी संप्रदाय - डॉ. जलाल महाराज सैयद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:55 IST

श्री १00८ महामंडलेश्वर डॉ. जलाल महाराज सैयद अकोल्यातील कौलखेडमध्ये सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद...

- नितीन गव्हाळे

अकोला: वारकरी संप्रदाय व्यापक आहे. सर्व धर्म ग्रंथांना मानणारा अनुसरून आणि व्यापक विचारसरणीचा हा एकमेव संप्रदाय आहे. सर्वांना सामावून घेत, विवेकवादी विचारधारा जपणारा हा संप्रदाय आहे. काळानुरूप संप्रदायामध्ये, कीर्तनामध्ये मोठे बदल होत आहेत. असे श्री १00८ महामंडलेश्वर डॉ. जलाल महाराज सैयद(कारंजीकर जि. नाशिक) यांनी सांगितले. अकोल्यातील कौलखेडमध्ये सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद...

तुम्ही वारकरी संप्रदायाशी कसे जुळले?मुस्लिम कुटूंबात जन्माला आलो असलो तरी, एक माणूस म्हणून कार्य करावे आणि माझ्या तीन पिढ्या वारकरी संप्रदायाच्या जुळलेल्या. पणजोबा एकतारी भजन करायचे. वडीलही भजन करायचे. त्यामुळे तो संस्कार माझ्यावर झाला आणि मी वारकरी संप्रदायाकडे जुळलो. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात सुद्धा कीर्तन करायला जातो. वारकरी संप्रदाय हा सर्वधर्म ग्रंथांना अनुसरून आहे. माणूस जन्माला आलो तर एक माणूस म्हणूनच आपण जगलो पाहिजे. समाजातील वेदना, दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कीर्तनामध्ये काय बदल होत आहेत. ?काळानुरूप कीर्तनाची परंपरा सुद्धा बदलत आहे. आतातर कीर्तन परंपरेने गरूडझेप घेतली आहे. श्रोत्यांनी कीर्तनकार म्हणून स्विकारताना, त्याच्या लोकप्रियतेवर न जाता, त्याच्याकडे किती ज्ञानसंपन्नता आहे. त्याची आचरण प्रतिभा कशी आहे. हे पाहून, कीर्तनकाराला स्विकारले पाहिजे. कीर्तन हे मनोरंजनाचे साधन नाही तर ते समाज प्रबोधन आहे. कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे.

तुम्ही कोणत्या विषयावर विचार प्रबंध लिहिला, त्याविषयी सांगा?मी रामायण ग्रंथावर विचार प्रबंध लिहिला. या विषयावरच मला विद्यापीठाने आचार्य पदवी मिळाली आहे. नुकतेच मला श्री १00८ महामंडलेश्वर पदवी सन्मानित केले आहे.

एक मुस्लिम कीर्तनकार म्हणून समाज कसा पाहतो?मुस्लिम कीर्तनकार म्हणूक कीर्तन करताना, लोकांना फार अप्रूप वाटत नाही. जात, धर्म बाजुला ठेऊन एक माणूस म्हणून म्हणून हे कार्य करतो. मी जे करतो आहे. ते प्रचलित परंपरेच्या विरोधात आहे. त्यामुळे अनेकदा त्रासही सहन करावा लागतो. समाजाने संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वरांना सोडलं नाही. परंतु जिथेही कीर्तन करायला जातो. लोक भरभरून प्रेम देतात. जगाचा विचार न करता, काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. भविष्यात अनाश्र आश्रम, आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाळा, वसतिगृह सुरू करण्याचा मानस आहे. कीर्तनातून कीर्तनच मांडल्या गेल्या पाहिजे. त्यात वैचारिक अतिक्रमणं आली की त्रास होतो. वारकरी संप्रदायात कोणत्याही वैचारिक भुमिकेला स्थान नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत