शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

वारी येथील डोहामध्ये गेले आतापर्यंत १६८ बळी !

By admin | Updated: August 17, 2016 02:22 IST

१९९२ पासून ते आत्तापर्यंत १६८ जणांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू; शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त.

गोवर्धन गावंडे हिवरखेड(जि. अकोला), दि. १६: अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी येथील डोहामध्ये १९९२ पासून १६८ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.वारी येथील नदीच्या पात्रामध्ये हनुमान मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या मामाभाच्याचा डोह, दत्त मंदिराजवळ व जामुठी डोहामध्ये अनेकांचे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. वारी येथील प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिरामध्ये २६ जानेवारी व १५ ऑगस्ट तसेच सुट्यांमध्ये या ठिकाणी बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यातील पर्यटक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतात. या ठिकाणी असलेल्या या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. डोहामध्ये बुडणार्‍यांमध्ये शालेय विद्यार्थी व युवकांचे प्रमाण जास्त असल्याने पोलीस स्टेशनच्या नोंदीवरून समजते. वारी हे गाव १९९0 ते ९२ च्या दरम्यान वसल्यानंतर वारी येथे मंदिरासह वान धरण पाहण्यासाठी शालेय सहली येतात. १९९२ पासून ते आत्तापर्यंत १६८ जणांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला असून यामध्ये शालेय विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात बुडाले आहेत. मागील २ वर्षामध्ये शेगाव, जळगाव या ठिकाणाहुन आलेल्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. १८ ते २५ पर्यंत वयोगटातील युवक या डोहामध्ये आंघोळीसाठी जातात. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंत कळत नसल्याने बुडतात. या ठिकाणी सामाजिक संस्था, पोलीस विभाग, महसूल विभाग यांनी जर येणार्‍या नागरिकांना डोहाच्या बाजुला सावधानतेचा इशारा देणारा फलक किंवा डोहाच्या आजुबाजूला तार कंपाउंड केले तर अनेकांचे जीव वाचू शकतील. पोलीस पाटील कासोटे यांनी सांगितले की, १९९२ पासून या वान नदीच्या डोहामध्ये आत्तापर्यंत १६८ लोकांना जलसमाधी मिळाली आहे.