शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

हाता गावामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात आल्यास गावकऱ्यांना पाणीटंचाई भासणार नाही; परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने अडचणींचा ...

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात आल्यास गावकऱ्यांना पाणीटंचाई भासणार नाही; परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. हाता गावात पाणीपुरवठ्यासाठी एकच बोअरवेल आहे. या बोअरवेलवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच विजेचा दाब कमी असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीने आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सरपंच कविता रवी मनसुटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विजेचा दाब कमी असल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले.

विजेचा दाब कमी असल्याने नागरिक त्रस्त

हाता : ३३ केव्ही उपकेंद्र कारंजा रम.अंतर्गत ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा होत असून हाता गावामध्ये विजेचा दाब कमी प्रमाणात राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या कमी दाबामुळे पिठाची गिरणी, कूलर, पंखे बंद आहेत, तसेच पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागामधील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सागद, नागद, निंबा, हाता, कारंजा रम. अंदुरा, नया अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा, हिंगणा, मोखा, वझेगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.