शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

२१ हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: March 4, 2017 02:42 IST

बाजार समिती आवारात ७८0 ट्रॉली उभ्या; तूर खरेदीस सुरुवात

अकोला, दि. ३- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर जिल्हय़ातील शेकडो शेतकर्‍यांनी गर्दी केली आहे. शुक्रवारपर्यंत नाफेडच्या केंद्रावर २१ हजारापेक्षा जास्त क्विंटल तूर आली असून, शेतकर्‍यांना मापाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी ५0 ते ५५ ट्रॉलीतील तुरीचे माप करण्यात आले. अडत्यांकडून तुरीला क्विंटलमागे ४२00 ते ४५00 रुपये दर मिळत आहेत, तर नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५0५0 रुपये दर मिळत असल्याने, शेतकर्‍यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. त्यात शासकीय तूर खरेदी केंद्र बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने, जिल्हय़ातील तूर उत्पादक शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठय़ा प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली. नाफेडकडे बारदान्याचा पुरेसा साठा नसल्यामुळे माप केलेली तूर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु आता बारदान्याची समस्यासुद्धा निकाली निघाली आहे. सद्यस्थितीत बाजार समितीच्या आवारातील दोन्ही बाजूला ७८0 ट्रॉली उभ्या आहेत. एकाच वेळी तूर विक्रीसाठी शेतकर्‍यांनी गर्दी केल्यामुळे बाजार समिती आणि नाफेडच्या अधिकार्‍यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तुरीचे माप लवकरच व्हावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा आपले कर्मचारी व साधने नाफेडच्या मदतीला दिले आहेत. केंद्रावर आलेल्या शेतकर्‍यांचे माप लवकर व्हावे, यासाठी हमाल, माथाडी कामगारांची संख्यासुद्धा वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत पाच ते सहा ठिकाणी तुरीचे माप होत होते; परंतु आता गुरुवारपासून दहा ते बारा ठिकाणावर तुरीचे माप करण्याची व्यवस्था करण्यात आली. गत आठ दिवसांपासून जिल्हय़ातील शेकडो शेतकर्‍यांचा माल बाजार समितीच्या आवारात पडून आहे. तुरीचे माप करण्यासाठी बाजार समितीकडून शेतकर्‍यांना टोकन क्रमांक दिले आहेत. टोकन क्रमांकानुसार शेतकर्‍यांच्या तुरीचे माप करण्यात येत आहे. तुरीला ५0५0 रुपये एवढा हमीभाव मिळत असल्याने, शेतकरी नाफेडवरच तूर खरेदीसाठी आणत आहेत. त्यासाठी शेतकरी आठ-आठ दिवस मुक्कामी राहत आहेत. क्वचितच शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडे तूर विकत आहेत. ढगाळ वातावरणाचा अंदाजयेत्या काही दिवसात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी बाजार समिती आवारात पडून असलेल्या मालाचे नुकसान होऊ नये. यादृष्टिकोनातून शेतकर्‍यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि माल झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. नाफेडच्या रकमेसाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षातूर खरेदीसाठी नाफेड केंद्राला शेतकरी प्राधान्य देत आहेत. अडत्यांप्रमाणे शेतकर्‍यांना रोख रक्कम मिळत नाही. नाफेडच्या रकमेसाठी शेतकर्‍यांना आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे आठ ते दहा दिवसांमध्ये रक्कम जमा होते.