शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

गतवर्षीचे पूरपीडित मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 16, 2014 12:30 IST

दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी अजूनही अनेक पूरपीडितांना शासकीय मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 
मूर्तिजापूर: गतवर्षी अतवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर येऊन त्यात अनेक शेतकर्‍यांची शेतजमीन पिकांसह खरवडून गेली होती. या प्रकाराला दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी अजूनही अनेक पूरपीडितांना शासकीय मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात अतवृष्टी होऊन तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला होता. या पुरामुळे नदी व नाल्यांच्या काठावरील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. पूर्णा नदीकाठावर शेत असणार्‍यांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली व पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाचे आदेशही निर्गमित करण्यात आले होते. पालक मंत्र्यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. तालुका प्रशासनाला पूरपीडितांना वाटप करावयाचे अनुदान चार ते पाच महिन्यांपूर्वीच मिळाल्याची माहिती आहे. दप्तर दिरंगाईमुळे गतवर्षी पावसाळय़ात नुकसान झालेले शेतकरी या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतरही शासकीय मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. चालू वर्षात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अवघ्या दोन महिन्यात शासकीय मदत मिळाली; परंतु गतवर्षीच्या पूरपीडितांना अद्यापपर्यंत मदत मिळालेली नसल्यामुळे शासनाच्या धोरणात असा विरोधाभास का, असा प्रश्न शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. शेतकर्‍यांनी खरीपपूर्व मशागतीला प्रारंभ केला असून, बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी त्यांना पैशांची गरज आहे. या गरजेच्या काळात तरी शासनाने पूरपीडितांना मदत जारी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
(तालुका प्रतिनिधी) गतवर्षी पुराची झळ बसलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी १२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ कोटी रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. 
- गजेंद्र मालठाणे, 
तहसीलदार, मूर्तिजापूर