शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

घरकूल लाभार्थीना अनुदानाची प्रतिक्षा 

By admin | Updated: February 13, 2017 16:48 IST

पाचशेच्यावर लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अर्धवटच आहे.

जिल्ह्यातील वास्तव: पाचशेच्यावर लाभार्थी वंचितवाशिम: जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेंतर्गत गतवर्षी मंजूर झालेल्या ६ हजार ६१९ घरकूलांचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊनही पाचशेच्यावर लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अर्धवटच आहे.शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात ६ हजार ६१९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. पात्र लाभार्थीनी या घरकुलांचे कामही सुरू केले आणि अनेक लाभार्थीनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण केले; परंतु यातील अनेक लाभार्थींना पुढील काम करण्यासाठी नियमानुसार अनुदानाचे हप्तेच मिळालेले नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या कुटुंबांना आता उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे. या संदर्भात जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली असता काही लाभार्थींचे अनुदान तांत्रिक कारणामुळे थांबले असल्याचे सांगण्यात आले. तथापि, पहिल्या टप्प्याच्या अनुदानापासून ३००, दुसऱ्या टप्प्याच्या अनुदानापासून २४०, तर तिसऱ्या टप्प्याच्या अनुदानापासूनही २१० लाभार्थी वंचित आहेत. या सर्व लाभार्थीनी घरकु लाच्या कामासाठी आपले पूर्वीचे कुडामातीचे घर पाडले आणि अनेकांचे काम अर्ध्यावर आले. यासाठी त्यांनी कर्जही काढले; परंतु वर्षभराचा कालावधि उलटला तरी, त्यांना अनुदानाचे हपते नियमानुसार मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थींना नियमानुसार अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. तांत्रिक कारणामुळे काही लाभार्थींचे अनुदान प्रलंबित असले तरी, त्यांना ते मिळणार आहेच. घरकुलाच्या अनुदानापासून नियमानुसार वंचित कोणालाही ठेवता येत नाही; परंतु लाभार्थींनी घरकुलाचे काम नियमानुसार करणे आवश्यक आहे.    

-के. एम. अहमद प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, वाशिम