शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

प्रतीक्षा निवडणुकीच्या तारखांची

By admin | Updated: September 1, 2014 22:50 IST

नियोजन थांबले: जागा वाटपही लांबले, कार्यकर्त्यांना संभ्रमाने पछाडले

बुलडाणा: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा लांबल्याने राजकीय पक्ष आणि प्रशासनाचाही खेळखंडोबा सुरू झाला आहे. एकदा का निवडणुकीची घोषणा झाली की, पुढील प्रक्रियेला गती येत असल्याने सर्वांचेच लक्ष निवडणुकीच्या तारखांकडे लागले आहे.विद्यमान विधानसभेचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा ९ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २0१४ असा आहे. त्यामुळे नोव्हेंबर पूर्वी विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या दोनच महिने शिल्लक आहेत. सुरुवातीला १५ ऑगस्टनंतर निवडणुकांची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. राजकीय जाणकारांनीही असेच आडाखे बांधले होते. ही तारीख डोळ्यापुढे ठेवूनच राजकीय पक्ष, उमेदवारीचे बाशिंग बांधून बसलेले इच्छुक व प्रशासनाने तयारी चालविली होती. इच्छुकांडून अर्ज मागवून घेणे, त्यांच्या मुलाखती घेणे, निरीक्षकांकडून आढावा घेणे आदी बाबी पक्षश्रेष्ठींनी धुमधडाक्यात सुरू केल्या होत्या. महायुतीने तर १५ ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू, अशीही घोषणा केली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसनेही जागा वाटपाच्या चर्चेंची गती वाढविली होती. दोन्ही काँग्रेसचे विभागीय मेळावेही पार पडले होते. नव्हे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा न् जिल्हा पिंजून वातावरण निर्मिती केली होती. विद्यमान आमदारांनी आपली उमेदवारी पक्की असल्याचे मानून मतदारसंघातील दौरे वाढविले होते. भूमिपूजन व लोकार्पणाचाही धडाका सुरू झाला होता. तर संभाव्य उमेदवार उमेदवारी मिळविण्यासह मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यावरही भर देण्यात गुंग झाले होते. अशीच काहीशी तयारी प्रशासनानेही चालविली होती. आचारसंहितेपूर्वी आमदार निधीतून प्रस्तावित झालेल्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरात देण्याची लगबग सुरू झाली होती. ज्या अधिकार्‍यांनी एकाच जिल्ह्यात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला अशा अथवा जे अधिकारी गृह जिल्ह्यात कार्यरत आहेत अशा अधिकार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रियाही आटोपण्यात आली होती. मतदार यादी अद्ययावत करणे, ईव्हीएमची व्यवस्था करणे, आदी प्रक्रियेलाही गती देण्यात आली होती. एकूणच राजकीय व प्रशासकीय पातळीवर विधानसभा निवडणुकांच्या कामांना गती देण्यात आली होती; मात्र ऑगस्ट महिना संपला तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली नाही. परिणामी, राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणेतही संथपणा आला आहे. राजकीय पातळीवरील घडामोडींचा वेग मंदावला आहे. महायुती व आघाडी यांच्यातील जागा वाटपाचे गुर्‍हाळ कायम आहे. तर तिसर्‍या आघाडीच्या रूपात नवा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार्‍या छोट्या-छोट्या पक्षांमधील उत्साहही कमी झाला आहे. आता गणेशोत्सव सुरू झाला. त्यामुळे संभव्य अचारसंहितेची तारीख पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. प्रशासनावर आधीच ताण वाढला आहे.महायुती अथवा आघाडी दोन्हींचे उमेदवार निश्‍चित होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी वाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांनी आपल्याच पारड्यात वजन टाकावे यासाठी काही इच्छुक गत काही महिन्यांपासून कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांचे लाड पुरवित आहेत. त्यासाठी त्यांना आर्थिक झळही सोसावी लागत आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंंत हा प्रकार सुरूच ठेवावा लागणार आहे. आता तर निवडणुका लांबल्यामुळे इच्छुकांचे बजेट वाढले असून, कार्यकर्त्यांची चंगळ सुरू झाली आहे.