शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

वाडी अदमपूर येथील जि. प. शाळेची इमारत शिकस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST

वाडी अदमपूर: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत शिकस्त झाली असून, ...

वाडी अदमपूर: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम वाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत शिकस्त झाली असून, विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. शिकस्त इमारतीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जि.प. शाळेची नवीन दुमजली इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंच रुपेश राठी यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, वाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, शाळेतील विद्यार्थी दोन वेगवेगळ्या इमारतीमध्ये शिक्षण घेतात. यापैकी ग्रामपंचायत कार्यालय जवळील इमारतींमध्ये उर्वरित वर्ग भरतात. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा परिषद शाळेची इमारत शिकस्त झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन जि. प. शाळेची नवीन दुमजली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

---------------------------

अपघाताची शक्यता वाढली!

येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत शिकस्त झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती न केल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

---------------------------------

शेत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

वाडी अदमपूर: शिवारातील पांदण शेतरस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात शेतकऱ्यांना नाहक त्रासाला समाेरे जावे लागते त्यामुळे पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच रुपेश राठी यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.

वाडी अदमपूर-वानखेड, वाडी अदमपूर-जाफ्रापूर-वरूड वडनेर, वाडी अदमपुर-निभोंरा, वाडी अदमपुर-शेरी या शेतरस्तांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना खत बी-बियाणे ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे परिसरातील पांदण रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सरपंच रुपेश राठी, उपसरपंच मीना शेळके, ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई कोतकर, सुरेंद्र भोंगळ, विठ्ठल खारोडे, जितेंद्र जाधव, रजित बोदडे, साधना बोदडे यांनी केली आहे.