शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकार्‍यांची बारुखेडा गावात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:14 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी ए. एम. बावने यांनी स्वत: बारुखेडा येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, मेळघाटचे आमदार पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुनर्वसीत ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देसुविधा देण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांनी दिला गावी परत जाण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी ए. एम. बावने यांनी स्वत: बारुखेडा येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, मेळघाटचे आमदार पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुनर्वसीत ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा व नागरतास या दोन गावांचे पुनर्वसन सन २0११ ते २0१५ मध्ये वारी हनुमान येथे करण्यात आले होते. त्यावेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सोयी व उदरनिर्वाहाचे आश्‍वासन दिले होते; मात्र दोन्ही गावांतील आदिवासी यांना गेलेल्या जमिनीचा मोबदला पाहिजे तो मिळाला नाही. या गावात आल्यानंतर पाच वर्षांत ७७ लहान-मोठय़ांचा मृत्यू झाल्याने आदिवासी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच येथे शासकीय सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. येथे आरोग्यसेवा उपलब्ध नसून, गावात कोणतेही कार्यालय नाही व मजुरीही मिळत नाही. त्यामुळे येथील आदिवासींनी या गावातून जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी येताच वन विभागाचे अधिकारी यांनी बारुखेडा, नागरतास येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेऊन माहिती घेतली. याबाबत मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी येथे सर्व आदिवासी यांना बोलावून सदर बैठकीमध्ये जुन्या गावात ९ सप्टेंबर रोजी परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे तुकाराम काकडे यांनी सांगितले. 

तहसीलदार यांनी गावात जाऊन केली चौकशीतेल्हाराचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी बारुखेडा व नागरतास येथे जाऊन आदिवासी यांची भेट घेतली. तेथील मूलभूत सुविधेच्या समस्या जाणून घेऊन तसे निर्देश अधिकार्‍यांना दिले; मात्र सदर आदिवासी यांनी मृत्यूच्या तांडवामुळे आम्ही येथे राहणार नसल्याचे उपस्थित अधिकारी यांनी सांगितले.