शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

वन अधिकार्‍यांची बारुखेडा गावात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:14 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी ए. एम. बावने यांनी स्वत: बारुखेडा येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, मेळघाटचे आमदार पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुनर्वसीत ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देसुविधा देण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांनी दिला गावी परत जाण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी ए. एम. बावने यांनी स्वत: बारुखेडा येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, मेळघाटचे आमदार पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुनर्वसीत ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा व नागरतास या दोन गावांचे पुनर्वसन सन २0११ ते २0१५ मध्ये वारी हनुमान येथे करण्यात आले होते. त्यावेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सोयी व उदरनिर्वाहाचे आश्‍वासन दिले होते; मात्र दोन्ही गावांतील आदिवासी यांना गेलेल्या जमिनीचा मोबदला पाहिजे तो मिळाला नाही. या गावात आल्यानंतर पाच वर्षांत ७७ लहान-मोठय़ांचा मृत्यू झाल्याने आदिवासी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच येथे शासकीय सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. येथे आरोग्यसेवा उपलब्ध नसून, गावात कोणतेही कार्यालय नाही व मजुरीही मिळत नाही. त्यामुळे येथील आदिवासींनी या गावातून जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी येताच वन विभागाचे अधिकारी यांनी बारुखेडा, नागरतास येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेऊन माहिती घेतली. याबाबत मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी येथे सर्व आदिवासी यांना बोलावून सदर बैठकीमध्ये जुन्या गावात ९ सप्टेंबर रोजी परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे तुकाराम काकडे यांनी सांगितले. 

तहसीलदार यांनी गावात जाऊन केली चौकशीतेल्हाराचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी बारुखेडा व नागरतास येथे जाऊन आदिवासी यांची भेट घेतली. तेथील मूलभूत सुविधेच्या समस्या जाणून घेऊन तसे निर्देश अधिकार्‍यांना दिले; मात्र सदर आदिवासी यांनी मृत्यूच्या तांडवामुळे आम्ही येथे राहणार नसल्याचे उपस्थित अधिकारी यांनी सांगितले.