शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वन अधिकार्‍यांची बारुखेडा गावात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:14 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी ए. एम. बावने यांनी स्वत: बारुखेडा येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, मेळघाटचे आमदार पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुनर्वसीत ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देसुविधा देण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांनी दिला गावी परत जाण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी ए. एम. बावने यांनी स्वत: बारुखेडा येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, मेळघाटचे आमदार पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुनर्वसीत ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा व नागरतास या दोन गावांचे पुनर्वसन सन २0११ ते २0१५ मध्ये वारी हनुमान येथे करण्यात आले होते. त्यावेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सोयी व उदरनिर्वाहाचे आश्‍वासन दिले होते; मात्र दोन्ही गावांतील आदिवासी यांना गेलेल्या जमिनीचा मोबदला पाहिजे तो मिळाला नाही. या गावात आल्यानंतर पाच वर्षांत ७७ लहान-मोठय़ांचा मृत्यू झाल्याने आदिवासी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच येथे शासकीय सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. येथे आरोग्यसेवा उपलब्ध नसून, गावात कोणतेही कार्यालय नाही व मजुरीही मिळत नाही. त्यामुळे येथील आदिवासींनी या गावातून जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी येताच वन विभागाचे अधिकारी यांनी बारुखेडा, नागरतास येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेऊन माहिती घेतली. याबाबत मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी येथे सर्व आदिवासी यांना बोलावून सदर बैठकीमध्ये जुन्या गावात ९ सप्टेंबर रोजी परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे तुकाराम काकडे यांनी सांगितले. 

तहसीलदार यांनी गावात जाऊन केली चौकशीतेल्हाराचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी बारुखेडा व नागरतास येथे जाऊन आदिवासी यांची भेट घेतली. तेथील मूलभूत सुविधेच्या समस्या जाणून घेऊन तसे निर्देश अधिकार्‍यांना दिले; मात्र सदर आदिवासी यांनी मृत्यूच्या तांडवामुळे आम्ही येथे राहणार नसल्याचे उपस्थित अधिकारी यांनी सांगितले.