शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यांची वाट बिकट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

हिंगणा ते वाडेगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसची ...

हिंगणा ते वाडेगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली असून, इतर चारचाकी वाहनांची वाहतूकदेखील बंद आहे. केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू असली तरी, खड्डे पाहूनच वाहनधारकांना चालावे लागते. रस्त्याच्या बिकट समस्येने या मार्गावरील ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत.

सुरज अशोक कदम

युवा शेतकरी, कळंबेश्वर

.............फोटो......................

गेल्या अडीच वर्षांपासून हिंगणा ते वाडेगाव या पालखी मार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते; मात्र लगेच ते बंद करण्यात आले. अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्याची आणखीच चाळण झाली असून, या रस्त्यावरून वाहनधारकांना चालणे कठीण झाले आहे. दोन महिन्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल होत आहे. त्यामुळे या मार्गावरील चारचाकी, तीनचाकी वाहनांची वाहतूक बंद असून, ९ किलोमीटर फेऱ्याने कापशी मार्गे वाहतूक सुरू आहे.

पंकज पाटील

नागरिक, माझोड.

.....................फोटो.........................

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ पासून लोहारापर्यंत २२ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खडे पडले असून, पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मांडोली, कोळासा, कसुरा, सोनगिरी, कळंबी, कळंबी महागाव, कळंबी खुर्द , डोंगरगाव व लोहारा इत्यादी गावांतील ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत. रस्त्यावरील खड्डे पाहून आणि चिखलातून वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे.या रस्त्यावर अनेकदा अपघाताचे प्रसंग घडत असून, अनेकांना कंबरदुखी व हाडांच्या आजाराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे.

-आम्रपाली खंडारे

सदस्य, जिल्हा परिषद.

............................................

७० रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार?

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून ७० रस्ते दुरुस्तीची कामे मंजूर आहेत. परंतु ग्रामीण भागातीलही जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे रखडलेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.