शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

खेड्यांची वाट बिकट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST

हिंगणा ते वाडेगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसची ...

हिंगणा ते वाडेगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून, रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली असून, इतर चारचाकी वाहनांची वाहतूकदेखील बंद आहे. केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू असली तरी, खड्डे पाहूनच वाहनधारकांना चालावे लागते. रस्त्याच्या बिकट समस्येने या मार्गावरील ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत.

सुरज अशोक कदम

युवा शेतकरी, कळंबेश्वर

.............फोटो......................

गेल्या अडीच वर्षांपासून हिंगणा ते वाडेगाव या पालखी मार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते; मात्र लगेच ते बंद करण्यात आले. अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्याची आणखीच चाळण झाली असून, या रस्त्यावरून वाहनधारकांना चालणे कठीण झाले आहे. दोन महिन्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल होत आहे. त्यामुळे या मार्गावरील चारचाकी, तीनचाकी वाहनांची वाहतूक बंद असून, ९ किलोमीटर फेऱ्याने कापशी मार्गे वाहतूक सुरू आहे.

पंकज पाटील

नागरिक, माझोड.

.....................फोटो.........................

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ पासून लोहारापर्यंत २२ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खडे पडले असून, पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मांडोली, कोळासा, कसुरा, सोनगिरी, कळंबी, कळंबी महागाव, कळंबी खुर्द , डोंगरगाव व लोहारा इत्यादी गावांतील ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत. रस्त्यावरील खड्डे पाहून आणि चिखलातून वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे.या रस्त्यावर अनेकदा अपघाताचे प्रसंग घडत असून, अनेकांना कंबरदुखी व हाडांच्या आजाराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे.

-आम्रपाली खंडारे

सदस्य, जिल्हा परिषद.

............................................

७० रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार?

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून ७० रस्ते दुरुस्तीची कामे मंजूर आहेत. परंतु ग्रामीण भागातीलही जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची कामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे रखडलेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.