शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

नऊ कोटींची थकबाकी पळविणार ग्रामस्थांच्या ‘तोंडचे पाणी’!

By admin | Updated: October 30, 2015 01:37 IST

८४ खेडी पाणीपुरवठा योजना चालविण्यास ‘मजीप्रा’ची असर्मथता!

अकोला- खारपाणपट्टय़ातील ७६ गावांचा समावेश असलेल्या आकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेची ९ कोटी रुपयांची थकबाकी या योजनेच्या मुळावर उठली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाने ही योजना चालविण्यास असर्मथता दर्शविली आहे. जिल्हा परिषदेने आहे त्या स्थिती योजना चालविण्यास मनाई केली, तर योजनेंतर्गत येणार्‍या गावांमध्ये उन्हाळ्य़ापूर्वीच पाणीटंचाई रौद्ररूप घेऊ शकते. अकोला शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचल्याने वाण प्रकल्पातून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी २00४ मध्ये ३२ लाख रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीत करण्यात आलेल्या या उपाययोजनेची उपयुक्तता संपल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच जलवाहिनीवर खारपाणपट्टय़ातील गावांनाही पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे ही योजना बंद न करता मजीप्राने पुढे सुरू ठेवावी आणि जिल्हा परिषदेने त्यासाठी निधी द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आकोट आणि इतर ८४ गावांसाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यात आली. या योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीचे काम जिल्हा परिषदेला करावयाचे होते. प्रत्यक्षात वसुलीकडे दुर्लक्ष झाले आणि जिल्हा परिषदेनेही योजना सुरू ठेवण्यासाठी निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे या योजनेची थकबाकी ९ कोटींच्या घरात पोहोचली आहे. या थकबाकीनेच आता खारपाणपट्टय़ातील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. मजीपाने ही योजना सुरू ठेवण्यास असर्मथता दर्शविली असून, जिल्हा परिषदेने त्यांच्या थाब्यात घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवावी, असे पत्र मजीप्राने जिल्हा परिषदेला दिले आहे. यापुढे योजना मजीप्रा चालविणार नाही, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने ही योजना ताब्यात घेण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.