शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नऊ कोटींची थकबाकी पळविणार ग्रामस्थांच्या ‘तोंडचे पाणी’!

By admin | Updated: October 30, 2015 01:37 IST

८४ खेडी पाणीपुरवठा योजना चालविण्यास ‘मजीप्रा’ची असर्मथता!

अकोला- खारपाणपट्टय़ातील ७६ गावांचा समावेश असलेल्या आकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेची ९ कोटी रुपयांची थकबाकी या योजनेच्या मुळावर उठली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाने ही योजना चालविण्यास असर्मथता दर्शविली आहे. जिल्हा परिषदेने आहे त्या स्थिती योजना चालविण्यास मनाई केली, तर योजनेंतर्गत येणार्‍या गावांमध्ये उन्हाळ्य़ापूर्वीच पाणीटंचाई रौद्ररूप घेऊ शकते. अकोला शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचल्याने वाण प्रकल्पातून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी २00४ मध्ये ३२ लाख रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीत करण्यात आलेल्या या उपाययोजनेची उपयुक्तता संपल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच जलवाहिनीवर खारपाणपट्टय़ातील गावांनाही पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे ही योजना बंद न करता मजीप्राने पुढे सुरू ठेवावी आणि जिल्हा परिषदेने त्यासाठी निधी द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आकोट आणि इतर ८४ गावांसाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यात आली. या योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीचे काम जिल्हा परिषदेला करावयाचे होते. प्रत्यक्षात वसुलीकडे दुर्लक्ष झाले आणि जिल्हा परिषदेनेही योजना सुरू ठेवण्यासाठी निधी देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे या योजनेची थकबाकी ९ कोटींच्या घरात पोहोचली आहे. या थकबाकीनेच आता खारपाणपट्टय़ातील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. मजीपाने ही योजना सुरू ठेवण्यास असर्मथता दर्शविली असून, जिल्हा परिषदेने त्यांच्या थाब्यात घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवावी, असे पत्र मजीप्राने जिल्हा परिषदेला दिले आहे. यापुढे योजना मजीप्रा चालविणार नाही, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने ही योजना ताब्यात घेण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.