शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या केबिनची तोडफोड

By admin | Updated: April 1, 2017 02:50 IST

पोलिसांना केले पाचारण; पाण्यासाठी महिला, नागरिकांचा मोर्चा.

हिवखेड(अकोला), दि. ३१- उन्हाळा लागत नाही, तोच येथील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत असून, या पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा चढविला. या मोर्चादरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे नागरिकांकडून ग्रामपंचायत कॅबिनच्या काचांची तोडफोड करण्यात आली.हिवरखेड या गावाची लोकसंख्या जवळपास ४0 हजार असून, गावाला वारी येथील वान धरणातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतकडून मात्र गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. गावातील व अनेक भागात ग्रामपंचायतकडून सोडलेले पाणी मुबलक स्वरूपात मिळत नसल्यामुळे गावातील अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांंपूर्वी नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी २४ तास चालणारे पाण्याचे सार्वजनिक स्टँडपोस्ट दिले होते; मात्र काही दिवसांपूर्वी हे सार्वजनिक स्टँडपोस्टसुद्धा ग्रामपंचायतकडून बंद करण्यात आलेत. यामुळे नागरिकांना आणखीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठय़ाची पाणी कर वसुलीदेखील सक्तीने मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. पाणी मिळत नसल्यामुळे आज प्रभाग क्र. १ च्या महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.