शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

विदर्भातून दहा तालुक्यांतील ग्रामस्थ होणार सहभागी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:41 IST

अकोट : जलसंवर्धन व जलसंधारणाकरिता राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता विदर्भातील १0 तालुक्यांमधून प्रतितालुका तीन एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसकरिता येणारा खर्च हा जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या बसची व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शासनाने १ ऑगस्ट रोजी आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देवॉटर कप बक्षीस समारंभ जलयुक्तच्या निधीमधून प्रवासाची तरतूदवॉटर कप स्पर्धेत जितापूरने बाजी मारली 

अकोट : जलसंवर्धन व जलसंधारणाकरिता राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता विदर्भातील १0 तालुक्यांमधून प्रतितालुका तीन एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसकरिता येणारा खर्च हा जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या बसची व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शासनाने १ ऑगस्ट रोजी आदेश दिले आहेत. राज्यात जलक्रांती घडविण्याकरिता शासनाच्या योजनेसोबतच अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशननेसुद्धा वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या वॉटर कपच्या माध्यमातून गावात लोकसहभाग व श्रमातून जलसंधारणाची कामे झाली. या कामांचे मूल्यमापन केल्यानंतर राज्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. या १२ पैकी प्रथम, द्वितीय व तृतीय या गावांची निवड करण्यात येणार आहे. या सर्व गावांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने ६ ऑगस्ट रोजी बालेवाडी पुणे येथे बक्षीस समारंभ ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरिता विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट, पातूर, बाश्रीटाकळी, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, राळेगाव, कळंब, अमरावती जिल्ह्यातील वरुड, धारणी, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वर्धा जिल्ह्यातील आर्णी अशा १0 तालुक्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या १0 तालुक्यांतून बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला १५00 गावकरी येण्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या गावांमधील नियोजनाबाबत माहिती देण्याकरिता व पाणी फाउंडेशनच्या बक्षीस समारंभाला उपस्थित राहण्याकरिता पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला गावकर्‍यांच्या येण्या-जाण्याकरिता प्रतितालुका राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसची व्यवस्था करावी, बसच्या प्रवासाकरिता येणारा खर्च जलयुक्त शिवारच्या आकस्मिक खर्चासाठी असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा, असे आदेश ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी पाच जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला विदर्भातील गावकर्‍यांच्या ३0 बस भरून जाणार आहेत. -