शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

पुनर्वसित गावातील ग्रामस्थ मेळघाटकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 16:02 IST

आकोट (जि. अकोला): शासनाकडून पुनर्वसित गावांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप करीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून आकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुळ गावांकडे परत जाण्यास शनिवारी सुरुवात केली.

ठळक मुद्दे१५ हजार ग्रामस्थ मेळघाटच्या दिशेने तणावाची परिस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त

आकोट (जि. अकोला): शासनाकडून पुनर्वसित गावांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप करीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून आकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुळ गावांकडे परत जाण्यास शनिवारी सुरुवात केली. शासनानं पुर्नवसित गावांमध्ये शासकीय सुविधा न पुरविल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मेळघाटातून अकोटमध्ये पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांचा एल्गार, प्रशासनाला झुगारून ग्रामस्थ आपापल्या मुळ गावाच्या दिशेने रवाना, सुमारे १५ हजार ग्रामस्थ असल्याची माहिती, तणावाची परिस्थिती असून अकोट ग्रामीण पोलीस, एसआरपीएफचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अकोट वन्य जीव विभागाने त्यांना असे न करण्याविषयी जाहीर आवाहन केले होते. मात्र, प्रशासनाचा विरोध झुगारून मेळघाट मधून अकोला जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आलेल्या नागरतास,अमोना,बारखेडा,धारगड,,गुल्लरघाट, सोमठाणा बु. सोमठाणा खु. व केलपाणी या गावातील सुमारे पंधरा हजार लोकांनी आपापल्या गावाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून अकोट ग्रामीण पोलीस, सीआरपीएफ चा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत