शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘जलक्रांती’साठी एकवटले ग्रामस्थ!

By admin | Updated: April 12, 2017 02:15 IST

अकोट तालुक्यात ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी श्रमदानाचे तुफान

विजय शिंदे - अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अकोट तालुक्यात दृष्काळाशी सामना करणाऱ्या ‘जलक्रांती’करिता ग्रामस्थ एकवटले आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ या स्पर्धेसाठी एकूण ३३ गावांनी सहभाग नोंदविलेला आहे. त्यापैकी अकोट तालुक्यात २१ गावात जलचळवळीचे ‘तुफान’ आल्यागत परिस्थिती झाली आहे.खोलवर गेलेल्या पाण्याला वर आणण्याकरिता राजकारण व स्वार्थ, मतभेद दूर ठेवीत कोणताही निधी अथवा खर्च नसलेल्या अभियानात केवळ श्रमदानाने मानवी साखळी निर्माण झाली आहे.अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार, सावरा, कावसा, उमरा, खैरखेड, जितापूर, पळसोद, रूपागड, गरसोळी, वरूर, अडगाव, हनवाडी, लामकाणी, सोनबर्डी, बोरी, जनुना, रूईखेड, एदलापूर, लोहारी, खिरखुंड, डोंगरखेडा या गावांनी श्रमदानात आघाडी घेतली आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत असल्याने ग्रामवासी भल्या पहाटे सकाळी ५ वाजतापासून श्रमदान करण्यास सज्ज होतात. श्रमदानास लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच लोक प्रामुख्याने सामाजिक संघ संस्था, संघटना श्रमदान करत आहेत. नाला खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्ष लावगडीकरिता खड्डे,आदींसह जलसंधारणाची कामे जोरात सुरू आहेत.या कामात अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे व गटविकास अधिकारी कालिदास तापी हे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून जितापूर रूपागड, आसेगाव, लामकाणी, अडगावसह दररोज एक-दोन गावांमध्ये श्रमदान करतात. या जलक्रांतीकरिता पाणी फाउंडेशन अकोटचे समन्वयक नरेंद्र काकड हे जनजागृती करीत उत्कृष्ट मार्गदर्शन करीत आहेत. शिवाय सामाजिक प्रशिक्षक सविता पेठकर,तांत्रिक प्रशिक्षक उज्ज्वल बोलवार, बाळासाहेब बढे कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य तसेच तंटामुक्तीचे पदाधिकारी हे सहकार्य करीत आहेत. जलचळवळीकरिता संकल्प व उपक्रमउमरा ग्रामवासीयांनी ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत गावात वाढदिवस साजरा न करता तो बंधाऱ्यावर श्रमदान करून साजरा करावा, असे ठरवले. या गावात मुलाचा वाढदिवस बांधावर साजरा केला, करीत ग्रामस्थांनी भेट वस्तू म्हणून टोपले, फावडे व घमीले श्रमदानासाठी देत आहेत. आसेगाव येथे विद्यार्थी यांनी आपली शिष्यवृत्ती श्रमदानासाठी दिली आहे. जितापूर रूपागड गावाने संपूर्ण दारूबंदी करून श्रमदानाचा निर्णय घेतला. ग्राम लामकाणी गावाने देहदान, नेत्रदान संकल्प करून श्रमदानास सुरुवात केली आहे. गाणी,गप्पा,गोष्टीकरिता मनोरंजनाने कामाला गती देण्यात येते. उमरा ग्रामवासीयांनी पाण्यासोबत गावकऱ्यांचे लग्न लावीत ‘पाण्याच्या थेंबात’ नवरदेवाची मिरवणूक गावातून काढली. गावकऱ्यांना श्रमदानासाठी घरोघरी जावून अक्षत दिली.