शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘जलक्रांती’साठी एकवटले ग्रामस्थ!

By admin | Updated: April 12, 2017 02:15 IST

अकोट तालुक्यात ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी श्रमदानाचे तुफान

विजय शिंदे - अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अकोट तालुक्यात दृष्काळाशी सामना करणाऱ्या ‘जलक्रांती’करिता ग्रामस्थ एकवटले आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ या स्पर्धेसाठी एकूण ३३ गावांनी सहभाग नोंदविलेला आहे. त्यापैकी अकोट तालुक्यात २१ गावात जलचळवळीचे ‘तुफान’ आल्यागत परिस्थिती झाली आहे.खोलवर गेलेल्या पाण्याला वर आणण्याकरिता राजकारण व स्वार्थ, मतभेद दूर ठेवीत कोणताही निधी अथवा खर्च नसलेल्या अभियानात केवळ श्रमदानाने मानवी साखळी निर्माण झाली आहे.अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार, सावरा, कावसा, उमरा, खैरखेड, जितापूर, पळसोद, रूपागड, गरसोळी, वरूर, अडगाव, हनवाडी, लामकाणी, सोनबर्डी, बोरी, जनुना, रूईखेड, एदलापूर, लोहारी, खिरखुंड, डोंगरखेडा या गावांनी श्रमदानात आघाडी घेतली आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत असल्याने ग्रामवासी भल्या पहाटे सकाळी ५ वाजतापासून श्रमदान करण्यास सज्ज होतात. श्रमदानास लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच लोक प्रामुख्याने सामाजिक संघ संस्था, संघटना श्रमदान करत आहेत. नाला खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्ष लावगडीकरिता खड्डे,आदींसह जलसंधारणाची कामे जोरात सुरू आहेत.या कामात अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे व गटविकास अधिकारी कालिदास तापी हे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून जितापूर रूपागड, आसेगाव, लामकाणी, अडगावसह दररोज एक-दोन गावांमध्ये श्रमदान करतात. या जलक्रांतीकरिता पाणी फाउंडेशन अकोटचे समन्वयक नरेंद्र काकड हे जनजागृती करीत उत्कृष्ट मार्गदर्शन करीत आहेत. शिवाय सामाजिक प्रशिक्षक सविता पेठकर,तांत्रिक प्रशिक्षक उज्ज्वल बोलवार, बाळासाहेब बढे कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य तसेच तंटामुक्तीचे पदाधिकारी हे सहकार्य करीत आहेत. जलचळवळीकरिता संकल्प व उपक्रमउमरा ग्रामवासीयांनी ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत गावात वाढदिवस साजरा न करता तो बंधाऱ्यावर श्रमदान करून साजरा करावा, असे ठरवले. या गावात मुलाचा वाढदिवस बांधावर साजरा केला, करीत ग्रामस्थांनी भेट वस्तू म्हणून टोपले, फावडे व घमीले श्रमदानासाठी देत आहेत. आसेगाव येथे विद्यार्थी यांनी आपली शिष्यवृत्ती श्रमदानासाठी दिली आहे. जितापूर रूपागड गावाने संपूर्ण दारूबंदी करून श्रमदानाचा निर्णय घेतला. ग्राम लामकाणी गावाने देहदान, नेत्रदान संकल्प करून श्रमदानास सुरुवात केली आहे. गाणी,गप्पा,गोष्टीकरिता मनोरंजनाने कामाला गती देण्यात येते. उमरा ग्रामवासीयांनी पाण्यासोबत गावकऱ्यांचे लग्न लावीत ‘पाण्याच्या थेंबात’ नवरदेवाची मिरवणूक गावातून काढली. गावकऱ्यांना श्रमदानासाठी घरोघरी जावून अक्षत दिली.