शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘जलक्रांती’साठी एकवटले ग्रामस्थ!

By admin | Updated: April 12, 2017 02:15 IST

अकोट तालुक्यात ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी श्रमदानाचे तुफान

विजय शिंदे - अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या अकोट तालुक्यात दृष्काळाशी सामना करणाऱ्या ‘जलक्रांती’करिता ग्रामस्थ एकवटले आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ या स्पर्धेसाठी एकूण ३३ गावांनी सहभाग नोंदविलेला आहे. त्यापैकी अकोट तालुक्यात २१ गावात जलचळवळीचे ‘तुफान’ आल्यागत परिस्थिती झाली आहे.खोलवर गेलेल्या पाण्याला वर आणण्याकरिता राजकारण व स्वार्थ, मतभेद दूर ठेवीत कोणताही निधी अथवा खर्च नसलेल्या अभियानात केवळ श्रमदानाने मानवी साखळी निर्माण झाली आहे.अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार, सावरा, कावसा, उमरा, खैरखेड, जितापूर, पळसोद, रूपागड, गरसोळी, वरूर, अडगाव, हनवाडी, लामकाणी, सोनबर्डी, बोरी, जनुना, रूईखेड, एदलापूर, लोहारी, खिरखुंड, डोंगरखेडा या गावांनी श्रमदानात आघाडी घेतली आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर -कप-२’ ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत असल्याने ग्रामवासी भल्या पहाटे सकाळी ५ वाजतापासून श्रमदान करण्यास सज्ज होतात. श्रमदानास लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच लोक प्रामुख्याने सामाजिक संघ संस्था, संघटना श्रमदान करत आहेत. नाला खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्ष लावगडीकरिता खड्डे,आदींसह जलसंधारणाची कामे जोरात सुरू आहेत.या कामात अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे व गटविकास अधिकारी कालिदास तापी हे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून जितापूर रूपागड, आसेगाव, लामकाणी, अडगावसह दररोज एक-दोन गावांमध्ये श्रमदान करतात. या जलक्रांतीकरिता पाणी फाउंडेशन अकोटचे समन्वयक नरेंद्र काकड हे जनजागृती करीत उत्कृष्ट मार्गदर्शन करीत आहेत. शिवाय सामाजिक प्रशिक्षक सविता पेठकर,तांत्रिक प्रशिक्षक उज्ज्वल बोलवार, बाळासाहेब बढे कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य तसेच तंटामुक्तीचे पदाधिकारी हे सहकार्य करीत आहेत. जलचळवळीकरिता संकल्प व उपक्रमउमरा ग्रामवासीयांनी ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत गावात वाढदिवस साजरा न करता तो बंधाऱ्यावर श्रमदान करून साजरा करावा, असे ठरवले. या गावात मुलाचा वाढदिवस बांधावर साजरा केला, करीत ग्रामस्थांनी भेट वस्तू म्हणून टोपले, फावडे व घमीले श्रमदानासाठी देत आहेत. आसेगाव येथे विद्यार्थी यांनी आपली शिष्यवृत्ती श्रमदानासाठी दिली आहे. जितापूर रूपागड गावाने संपूर्ण दारूबंदी करून श्रमदानाचा निर्णय घेतला. ग्राम लामकाणी गावाने देहदान, नेत्रदान संकल्प करून श्रमदानास सुरुवात केली आहे. गाणी,गप्पा,गोष्टीकरिता मनोरंजनाने कामाला गती देण्यात येते. उमरा ग्रामवासीयांनी पाण्यासोबत गावकऱ्यांचे लग्न लावीत ‘पाण्याच्या थेंबात’ नवरदेवाची मिरवणूक गावातून काढली. गावकऱ्यांना श्रमदानासाठी घरोघरी जावून अक्षत दिली.