आशिष गावंडे /प्रवीण ठाकरे
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २९ - भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला मोठे महत्व आहे. श्रावणातील सोमवारी तर राज्यभरात महादेवाच्या भक्तीचा महापूर येतो. अकोल्यात मात्र श्रावण सोमवारचे वेगळेच महत्व आहे. शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वराला नजीकच्या गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून त्याचा महादेवाला जलाभिषेक केला जातो. शेकडो वर्षे प्राचिन असलेली ही परंपरा आजतागायत सुरुच आहे. किंबहुना ही परंपरा अधिकच दृढ होत आहे. शहरातील शिवभक्त रविवारी रात्री तांबे-पितळेचे मोठे कलश घेऊन येथून १८ किमी अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर गेले होते व तेथील पाणी घेऊन राजराजेश्वराला अभिषेक करण्यासाठी शहरात दाखल झाले हा संपूर्ण प्रवास ते पायीच केला जाते याला कावडयात्रा असे संबोधल्या जाते. ढोल, ताशे, डफडे व इतर चर्मवाद्यांचा गजर करीत शिवभक्त या कावडयात्रेत सहभागी होतात. ‘हर्र बोला महादेव’चा जयघोषाने आसमंत निनादून जातो. ही कावड यात्रा पूर्वी फक्त शेवटच्या श्रावण सोमवारी होत असे. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन १३७ पालख्यांच्या सहभागामुले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत
यंदाच्या कावड यात्रेमध्ये शहरातील डाबकी रोडवरील जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळांची कावड १0१ भरण्यांची (कलश) आहे. डाबकी रोडवासीयांची कावड ४५१ भरण्यांची राहणार आहे. हरिहरपेठ शिवभक्त मंडळाची कावड ३५१ भरण्यांची आहे, तर सर्वात मोठी कावड ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शिवभक्त मंडळाची असून, ती ५५१ कलशांची आहे.