शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

विदर्भातील कोट्यवधीची वनसंपत्ती संकटात

By admin | Updated: August 14, 2015 23:02 IST

सागवनावर स्पोडोप्टेराचा हल्ला, सागवानाची वाढ व ऑक्सिजन पुरवठा थांबला.

बुलढाणा : निसर्गाचा मौल्यवान ठेवा म्हणूान ओळखल्या जाणार्‍या सागवान या वृक्षावर विदर्भात स्पोडोप्टेरा नामक अळीने हल्ला चढविला आहे. ही अळी झाडाची सर्व पाने खात असल्यामुळे झाडं काळी पडत आहेत. त्यामुळे कोट्यवधीची ही वनसंपदा सध्या संकटात सापडली आहे. बुलढाणा जिल्हयात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. येथे विविध प्रकारच्या जातीची झाडे आहे. यात सर्वाधिक झाडे सागवानची आहेत. साग, शिवन, शिसम हे वनोपज असल्यामुळे त्यांच्या कटाईवर बंदी आहे. शासनाने जाहीर केलेल्या राखीव वृक्षांमध्ये सागवानचा समावेश असल्यामुळे हे वृक्ष तोडण्याआधी वनअधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे या झाडाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. विदर्भात या सागवानच्या झाडांना मागील काही दिवसांपासून स्पोडोप्टेरा नावाच्या अळीने सुरंग लावला आहे. स्पोडोप्टेरा अळी झाडाचे सर्व पाने खावून टाकते, झाडास पाने नसल्याने तो उन शोषून घेवू शकत नाही. त्यामुळे वृक्षाची प्रकाश सेंषण क्रिया प्रभावित झाली असल्याची माहिती सामाजिक वनिकरण विभागाकडून मिळाली आहे. जंगलातील अथवा रस्त्यावरील झाडांवर कोणत्याही प्रकारचा रोग आल्यास अथवा त्यांच्या संरक्षणासाठी तत्काळ उपाययोजना करण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे दरवर्षी या वृक्षांना अशा प्रकारच्या संकटांना समोरे जावे लागत असल्याचे बुलडाणा विभागाचे सामाजिक वनिकरण संचालक एस. आर मोरे यांनी सांगीतले.

महामंडळाचे कार्य थांबले

         वृक्ष संवर्धनासाठी शासनाच्यावतीने वृक्ष विकास महामंडळ स्थापन करण्यात आले होते. या महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे अनुदान, वेतन आदी विविध कारणामुळे महामंडळाचे काम काही वर्षातच थांबविण्यात आले. परिणामी अशा संकटांची दखल घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेतांना दिसत नाही.

रोग निर्मुलनासाठी प्रभावी सुविधा नाही

     इतर राज्यात वृक्ष संवर्धनासाठी काही प्रभावी उपाययोजना आहेत. विदर्भात यासंदर्भात कोणत्याही प्रभावी उपाय योजना नाहीत. त्यामुळे कोटयवधीची वनसंपदा नष्ट होत चालली आहे.

जवाबदारी कुणाची?

  सामाजिक वणीकरण विभाग व वनविभाग या दोघांवर वृक्ष संरक्षणाची जवाबदारी असते; मात्र लोकवस्ती आणि रस्त्यावरील वृक्षाची जवाबदारी ही सामाजिक वनिकरण विभगाची तसेच वनक्षेत्रातील वृक्षांची जवाबदारी ही वनविभागाची अशी विभागणी करण्यात आली आहे. शासन मात्र वृक्ष संवर्धनाची जवाबदारी सर्वांंचीच असल्याचे ओरडून ओरडून सांगते. त्यामुळे नेमकी ही जवबादारी कुणी घ्यावी हा पेच सोडविण्याची आवश्यकता आहे.