शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

विदर्भातील कोट्यवधीची वनसंपत्ती संकटात

By admin | Updated: August 14, 2015 23:02 IST

सागवनावर स्पोडोप्टेराचा हल्ला, सागवानाची वाढ व ऑक्सिजन पुरवठा थांबला.

बुलढाणा : निसर्गाचा मौल्यवान ठेवा म्हणूान ओळखल्या जाणार्‍या सागवान या वृक्षावर विदर्भात स्पोडोप्टेरा नामक अळीने हल्ला चढविला आहे. ही अळी झाडाची सर्व पाने खात असल्यामुळे झाडं काळी पडत आहेत. त्यामुळे कोट्यवधीची ही वनसंपदा सध्या संकटात सापडली आहे. बुलढाणा जिल्हयात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. येथे विविध प्रकारच्या जातीची झाडे आहे. यात सर्वाधिक झाडे सागवानची आहेत. साग, शिवन, शिसम हे वनोपज असल्यामुळे त्यांच्या कटाईवर बंदी आहे. शासनाने जाहीर केलेल्या राखीव वृक्षांमध्ये सागवानचा समावेश असल्यामुळे हे वृक्ष तोडण्याआधी वनअधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे या झाडाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. विदर्भात या सागवानच्या झाडांना मागील काही दिवसांपासून स्पोडोप्टेरा नावाच्या अळीने सुरंग लावला आहे. स्पोडोप्टेरा अळी झाडाचे सर्व पाने खावून टाकते, झाडास पाने नसल्याने तो उन शोषून घेवू शकत नाही. त्यामुळे वृक्षाची प्रकाश सेंषण क्रिया प्रभावित झाली असल्याची माहिती सामाजिक वनिकरण विभागाकडून मिळाली आहे. जंगलातील अथवा रस्त्यावरील झाडांवर कोणत्याही प्रकारचा रोग आल्यास अथवा त्यांच्या संरक्षणासाठी तत्काळ उपाययोजना करण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे दरवर्षी या वृक्षांना अशा प्रकारच्या संकटांना समोरे जावे लागत असल्याचे बुलडाणा विभागाचे सामाजिक वनिकरण संचालक एस. आर मोरे यांनी सांगीतले.

महामंडळाचे कार्य थांबले

         वृक्ष संवर्धनासाठी शासनाच्यावतीने वृक्ष विकास महामंडळ स्थापन करण्यात आले होते. या महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे अनुदान, वेतन आदी विविध कारणामुळे महामंडळाचे काम काही वर्षातच थांबविण्यात आले. परिणामी अशा संकटांची दखल घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेतांना दिसत नाही.

रोग निर्मुलनासाठी प्रभावी सुविधा नाही

     इतर राज्यात वृक्ष संवर्धनासाठी काही प्रभावी उपाययोजना आहेत. विदर्भात यासंदर्भात कोणत्याही प्रभावी उपाय योजना नाहीत. त्यामुळे कोटयवधीची वनसंपदा नष्ट होत चालली आहे.

जवाबदारी कुणाची?

  सामाजिक वणीकरण विभाग व वनविभाग या दोघांवर वृक्ष संरक्षणाची जवाबदारी असते; मात्र लोकवस्ती आणि रस्त्यावरील वृक्षाची जवाबदारी ही सामाजिक वनिकरण विभगाची तसेच वनक्षेत्रातील वृक्षांची जवाबदारी ही वनविभागाची अशी विभागणी करण्यात आली आहे. शासन मात्र वृक्ष संवर्धनाची जवाबदारी सर्वांंचीच असल्याचे ओरडून ओरडून सांगते. त्यामुळे नेमकी ही जवबादारी कुणी घ्यावी हा पेच सोडविण्याची आवश्यकता आहे.