शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
3
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
4
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
5
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
6
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
7
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
8
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
9
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
10
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
11
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
12
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
13
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
14
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
15
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
16
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
17
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
18
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु

विदर्भातील कृषी विकासाचा दर घसरलेलाच!

By admin | Updated: December 14, 2014 23:55 IST

कृषी पॅकेजची हवी जलद अंमलबजावणी.

राजरत्न सिरसाट / अकोलाविदर्भातील कृषी विकासाचा दर शून्य तीन टक्केपेक्षा खाली घसरला असून, कृषी विकासाला गती देण्यासाठी सिंचन प्रकल्पांच्या कामांची पूर्तता करणे आवश्यक असल्याने शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी आता विनाविलंब करण्याची गरज आहे.मागील दहा वर्षांतील (२000 ते २0१0) कृषी विकासाचा दर कमी-अधिक या स्वरू पात असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला असून, सरासरी विकास दर हा या दहा वर्षांत कमीच असल्याचे निदर्शनास आले आहे. या निष्कर्षाचा सार तज्ज्ञांनी समतोल प्रादेशिक उच्चाधिकार समितीपुढे ठेवला असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. या निष्कर्षाप्रमाणे विदर्भातील सरासरी कृषी विकासाचा दर हा 0.३ टक्केपेक्षा खाली घसरला असून, त्यांचे गंभीर परिणाम विदर्भातील शेतकर्‍यांना सोसावे लागत असल्याची धक्कादायक बाब या निमित्ताने समोर आली आहे.विदर्भातील पावसाचे प्रमाण असमान असून, गेल्या दहा वर्षांतील उत्पन्न घटले आहे. शेतकर्‍यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. गेल्यावर्षीची अतवृष्टी आणि यावर्षी पुन्हा दुष्काळ यामुळे सरासरी उत्पादन घसरले असून, यावर्षी तर सोयाबीनचा उतारा आणि कापसाचे हेक्टरी उत्पादन घटले आहे. शेतकर्‍यांनी पर्यायी पिकांचा शोध घेतला, पण कोणतेच पीक साथ देत नसल्याने निदर्शनास आले आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसून, कुंटुबांचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रकार सुरू आहेत. याच परिस्थितीतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी विदर्भातील कोरडवाहू शेतकर्‍यांना संरक्षित पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे असून, पाणलोटाची कामे करण्यासाठी जलनीती सक्षमपणे आखण्याची गरज तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. यासाठी भूजल साठा वाढविणे, कमी खर्चाची शाश्‍वत शेती, एकूणच धोरणात्मक बदल करू न काटेकोर पद्धतीचा अवलंब, धान्य उत्पादन वाढविणे अत्यंत आवश्यक असून, शेतकर्‍यांच्या उत्पादित शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव देणे आवश्यक आहे.मागील दहा वर्षांंतील अभ्यासानुसार सरासरी कृषी विकासाचा दर अत्यंत कमी असून, या दहा वर्षांत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले नाही, परिणामी हातात पैसा आला नाही. आता शेतकर्‍यांचे उत्पादन, उत्पन्न कसे वाढेल, यावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे समतोल प्रादेशिक विकास उच्चाधिकार समितीचे सदस्य डॉ. व्यंकटराव मायंदे यांनी स्पष्ट केले.