शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

विदर्भातील कृषी विकासाचा दर घसरलेलाच!

By admin | Updated: December 14, 2014 23:55 IST

कृषी पॅकेजची हवी जलद अंमलबजावणी.

राजरत्न सिरसाट / अकोलाविदर्भातील कृषी विकासाचा दर शून्य तीन टक्केपेक्षा खाली घसरला असून, कृषी विकासाला गती देण्यासाठी सिंचन प्रकल्पांच्या कामांची पूर्तता करणे आवश्यक असल्याने शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी आता विनाविलंब करण्याची गरज आहे.मागील दहा वर्षांतील (२000 ते २0१0) कृषी विकासाचा दर कमी-अधिक या स्वरू पात असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला असून, सरासरी विकास दर हा या दहा वर्षांत कमीच असल्याचे निदर्शनास आले आहे. या निष्कर्षाचा सार तज्ज्ञांनी समतोल प्रादेशिक उच्चाधिकार समितीपुढे ठेवला असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. या निष्कर्षाप्रमाणे विदर्भातील सरासरी कृषी विकासाचा दर हा 0.३ टक्केपेक्षा खाली घसरला असून, त्यांचे गंभीर परिणाम विदर्भातील शेतकर्‍यांना सोसावे लागत असल्याची धक्कादायक बाब या निमित्ताने समोर आली आहे.विदर्भातील पावसाचे प्रमाण असमान असून, गेल्या दहा वर्षांतील उत्पन्न घटले आहे. शेतकर्‍यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. गेल्यावर्षीची अतवृष्टी आणि यावर्षी पुन्हा दुष्काळ यामुळे सरासरी उत्पादन घसरले असून, यावर्षी तर सोयाबीनचा उतारा आणि कापसाचे हेक्टरी उत्पादन घटले आहे. शेतकर्‍यांनी पर्यायी पिकांचा शोध घेतला, पण कोणतेच पीक साथ देत नसल्याने निदर्शनास आले आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या हातात पैसाच नसून, कुंटुबांचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रकार सुरू आहेत. याच परिस्थितीतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी विदर्भातील कोरडवाहू शेतकर्‍यांना संरक्षित पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे असून, पाणलोटाची कामे करण्यासाठी जलनीती सक्षमपणे आखण्याची गरज तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. यासाठी भूजल साठा वाढविणे, कमी खर्चाची शाश्‍वत शेती, एकूणच धोरणात्मक बदल करू न काटेकोर पद्धतीचा अवलंब, धान्य उत्पादन वाढविणे अत्यंत आवश्यक असून, शेतकर्‍यांच्या उत्पादित शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव देणे आवश्यक आहे.मागील दहा वर्षांंतील अभ्यासानुसार सरासरी कृषी विकासाचा दर अत्यंत कमी असून, या दहा वर्षांत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले नाही, परिणामी हातात पैसा आला नाही. आता शेतकर्‍यांचे उत्पादन, उत्पन्न कसे वाढेल, यावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे समतोल प्रादेशिक विकास उच्चाधिकार समितीचे सदस्य डॉ. व्यंकटराव मायंदे यांनी स्पष्ट केले.