शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

विदर्भात आता फलोत्पादन बीजोत्पादन!

By admin | Updated: September 17, 2015 23:17 IST

शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर; शेती व उद्यान विद्या प्रशिक्षण प्रकल्पास शासनाची मंजुरी.

अकोला : विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात असून, विदर्भात खरीप, रब्बीनंतर फलोत्पादन बीजोत्पादन प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यास राज्याच्या कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. २0१४-१५ व २0१६-१७ या दोन वर्ष हा प्रकल्प विदर्भात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या प्रशिक्षण प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.शेतकर्‍यांनी स्वत: उच्चप्रतीचे शुद्ध बियाणे निर्माण करण्यासाठी मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) प्रकल्पांतर्गत या कृषी विद्यापीठाला ८ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोत्पादन करण्यात सुरुवात केली आहे. आता नव्याने चालू आर्थिक व पुढच्या आर्थिक वर्षासाठी राज्यात शेती व उद्यान विद्या बीजोत्पादन निर्मितीवर भर दिला जाणार असून, त्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच बीजोत्पादन कार्यक्रमाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्याच्या कृषी मंत्रालयाने या विषयावरील प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यासाठीची मान्यता दिली आहे.या प्रकल्पांतर्गत गटशेतीद्वारे विविध शेती, उद्यान विद्या बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अगोदर आदिवासी भागातील शेतकर्‍यांना बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला आहे. विविध पिकाचे शुद्ध व उच्च दर्जाचे बियाणे निमिर्तीसाठी या प्रकल्पाला व्यापक स्वरू प देण्याचा कृषी मंत्रालयाचा प्रयत्न असून, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविणे शक्य असल्याने विदर्भातच नव्हे, तर राज्यात बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी आरकेव्हीवाय अंतर्गत अनुदान उपलब्ध करू न दिले जात आहे. विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने या बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात आहे. शेतकरी गटाला यासाठी प्रोत्सहित करण्यात येत आहे. किमान गावातील शेतकर्‍यांची शुद्ध बियाण्यांची गरज भागावी, हा त्या मागील उद्देश आहे.शेतकर्‍यांनी काढलेल्या शेतमालाचे पॅकिंग आणि प्रतवारी करता यावी व शुद्ध बीजोत्पादन करावे, यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरकेव्हीवाय अंतर्गत यावर्षी या कार्यक्रमाला मान्यता मिळाली आहे. शेतकरी गटांना या प्रकल्पात प्राधान्य देण्यात येत असल्याचे कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी सांगीतले.