शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

विदर्भात आता फलोत्पादन बीजोत्पादन!

By admin | Updated: September 17, 2015 23:17 IST

शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर; शेती व उद्यान विद्या प्रशिक्षण प्रकल्पास शासनाची मंजुरी.

अकोला : विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात असून, विदर्भात खरीप, रब्बीनंतर फलोत्पादन बीजोत्पादन प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यास राज्याच्या कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. २0१४-१५ व २0१६-१७ या दोन वर्ष हा प्रकल्प विदर्भात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या प्रशिक्षण प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.शेतकर्‍यांनी स्वत: उच्चप्रतीचे शुद्ध बियाणे निर्माण करण्यासाठी मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) प्रकल्पांतर्गत या कृषी विद्यापीठाला ८ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोत्पादन करण्यात सुरुवात केली आहे. आता नव्याने चालू आर्थिक व पुढच्या आर्थिक वर्षासाठी राज्यात शेती व उद्यान विद्या बीजोत्पादन निर्मितीवर भर दिला जाणार असून, त्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच बीजोत्पादन कार्यक्रमाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्याच्या कृषी मंत्रालयाने या विषयावरील प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यासाठीची मान्यता दिली आहे.या प्रकल्पांतर्गत गटशेतीद्वारे विविध शेती, उद्यान विद्या बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अगोदर आदिवासी भागातील शेतकर्‍यांना बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला आहे. विविध पिकाचे शुद्ध व उच्च दर्जाचे बियाणे निमिर्तीसाठी या प्रकल्पाला व्यापक स्वरू प देण्याचा कृषी मंत्रालयाचा प्रयत्न असून, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविणे शक्य असल्याने विदर्भातच नव्हे, तर राज्यात बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी आरकेव्हीवाय अंतर्गत अनुदान उपलब्ध करू न दिले जात आहे. विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने या बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात आहे. शेतकरी गटाला यासाठी प्रोत्सहित करण्यात येत आहे. किमान गावातील शेतकर्‍यांची शुद्ध बियाण्यांची गरज भागावी, हा त्या मागील उद्देश आहे.शेतकर्‍यांनी काढलेल्या शेतमालाचे पॅकिंग आणि प्रतवारी करता यावी व शुद्ध बीजोत्पादन करावे, यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरकेव्हीवाय अंतर्गत यावर्षी या कार्यक्रमाला मान्यता मिळाली आहे. शेतकरी गटांना या प्रकल्पात प्राधान्य देण्यात येत असल्याचे कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी सांगीतले.