शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

By admin | Updated: August 27, 2015 00:51 IST

अकोल्याचे दोन प्रकल्प जोडले थेट मुख्यमंत्री वाररूमला.

राजरत्न सिरसाट / अकोला: विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या बांधकामासाठी दोन वर्षांंपासून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने विदर्भ, पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या बांधकामाच्या किमती वाढत असून, बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव प्रकल्पाची किंमत आजमितीस ५ हजार ७00 कोटी एवढी झाली आहे. प्रत्यक्षात आतापर्यंंत या प्रकल्पाच्या बांधकामासाठी १४00 कोटीच प्राप्त झाले आहेत. दरम्यान, अकोला जिल्हय़ातील दोन प्रकल्प थेट मुख्यमंत्र्याच्या वार रू मला जोडण्यात आली आहेत. जलसंपदा विभागाने यावर्षी राज्यासाठी जवळपास ७७00 कोटींची तरतूद केली असून, विदर्भातील सिंचन प्रकल्पाची कामे सुरू करण्यासाठी यावर्षी ३२00 कोटी रकमेची तजवीज करण्यात आली होती. पण, कामे सुरू करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळत नसल्याने ही रक्कम खर्च करणार कशी, असे प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पडले आहेत. मागील वर्षी विदर्भातील अठराशे कोटींचा निधी अखर्चित होता. याच प्रशासकीय मान्यतेअभावी अकोला जिल्हय़ाला मिळालेले ३00 कोटींहून अधिक निधी अखर्चित राहिला आहे. पश्‍चिम विदर्भात आजमितीस सिंचनाचा २ लाख ४७ हजार हेक्टरचा अनुशेष कायम आहे.  बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आठ वर्षांंपासून रखडला आहे. या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने आजमितीस या प्रकल्पाच्या बांधकामाची रक्कम ५ हजार ७00 कोटी एवढी झाली आहे. त्या तुलनेत आतापर्यंंत केवळ १४00 कोटींचा निधी टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे केवळ ४0 टक्कय़ाच्या आतच या प्रकल्पाचे काम झाले आहे. २00८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाचा मुहूर्त निघाला. त्यावेळी शेतीचे भाव हे ८0 हजार ते एक लाख रुपये एकर होते. आजमितीस एका एकराचे भाव १0 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करायचे आहे. या भूसंपादनालाच ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अकोल्याचे दोन प्रकल्प मुख्यमंत्री वार रू मशी कनेक्ट

        सिंचन प्रकल्पाची कामे जलद गतीने होण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वार रू म तयार करण्यात आली असून, राज्यातील इतर प्रक ल्पासह अकोला जिल्हय़ातील वाई व शहापूर या दोन प्रकल्पांना थेट मुख्यमंत्री वार रू मला कनेक्ट करण्यात आले आहे. येत्या वर्षात नेरधामणात अडणार पाणी! खारपाणपट्ट्यातील नेरधामणा बॅरेजचे काम ७0 टक्के पूर्ण झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू न बांधण्यात आलेल्या या बॅरेजमध्ये येत्या मार्च २0१६ मध्ये पाणी अडविले जाणार आहे.