शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

विदर्भात शेतक-यांचे कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर भर!

By admin | Updated: August 3, 2015 00:32 IST

शेतकरी उत्पादक गट, कंपन्यांचे मागवले प्रस्ताव; ५0 टक्के अनुदान मिळणार.

अकोला : खेड्यातच कृषिमालावर आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले जात असून, यंदाही कृषी उद्योजक गट प्रकल्पांतर्गत निवडलेल्या विदर्भातील शेतकरी उत्पादक गट, कंपन्यांचे प्रस्ताव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) मागविण्यात आले आहेत. या योजनेत शेतकरी गटांना ५0 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राज्यात आत्मा यंत्रणेमार्फत गत पाच वर्षांपासून स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमावर जोर देण्यात आला आहे. यात मुख्यत्वे पीक उत्पादनात वाढ, उत्पादकता वाढ व वाढीव बाजाराच्या संधी शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून २0१५-१६ यावर्षी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, याकरिता कृषी उद्योजक गट या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी उद्योजक गटामार्फत निवडलेल्या शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी कंपनीच्या लाभार्थींना कापणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळे प्रकल्प, मूल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन प्रकल्प, तसेच कृषी मूल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरण, कृषी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन विकासाला प्रोत्साहन देणारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प उभारण्यासाठी लाभार्थींना अहवाल सादर करावा लागणार आहेत. या कृषी उद्योजकता प्रस्तावामधील प्रकल्प उभारणीसाठी लागणारी यंत्र व उपकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध आहे. यंत्र व उपकरणांसाठी लागणार्‍या खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त १0 लाख रुपये इतके अनुदान शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी कंपनीच्या लाभार्थींना देण्यात येणार आहे.