शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजय आमचाच, दावा सर्वांचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST

अकाेला जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निकालामध्ये मतदारांनी तरुणांना तसेच नवागतांना संधी देत त्यांच्या ...

अकाेला जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निकालामध्ये मतदारांनी तरुणांना तसेच नवागतांना संधी देत त्यांच्या हाती गावगाडा साेपविला आहे. संपूर्ण निवडणुकीच्या काळात ही निवडणूक पक्षीय नाही, असा दावा करणारे सर्वच राजकीय पक्ष आता आमच्या पक्षाचाच विजय झाला, असे दावे-प्रतिदावे करत असून, विजयी उमेदवारांची माेट बांधून सत्ता हस्तगत करण्याच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तनाचा बिगुल वाजला आहे. प्रस्थापितांच्या पॅनेलला नकार देत मतदारांनी नव्या दमाच्या तरुणांच्या हाती सत्ता साेपविली आहे. अकाेट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीमध्ये आमदार अमाेला मिटकरी यांच्या नेतृत्वातील पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे, तर काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या माेहळा गावात त्यांच्या गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. तालुक्यातील अर्ध्याअधिक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन घडले आहे. बाळापूर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींपैकी वाडेगाव, पारस, गायगाव, हातरूण, निमकर्दा, उरळ या माेठया गावांमध्ये परिर्वतनाची लाट आहे. रिधाेरामध्ये सत्ता जैसे थे ठेवण्यात आली आहे. मूर्तीजापूर तालुक्यातील २७ गावांपैकी अनेक गावांमध्ये मतदारांनी बदल घडविला आहे. कुरूम, सिरसाे, हातगाव या माेठ्या गावांमध्ये दीड दशकांपासून सत्तेचे परिवर्तन घडले आहे. बार्शी-टाकळी तालुक्यातही पिंजर राजंदा महान या गावात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले आहे. तेल्हाऱ्यात वंचितला ३२ पैकी १४ ग्रामंपचातींवर यश मिळाले असले, तरी जि. प. अध्यक्षांच्या गावातच वंचित पराभूत झाला आहे. अकाेला तालुक्यातही परिवर्तनाचे वारे आह, तर पातुर तालुक्यात सेनेला १६ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविता आला आहे.

३३५ सदस्यांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत १० ग्रामपंचायती अविरोध झाल्या. या १० ग्रामपंचायतींच्या ७४ उमेदवारांसह जिल्ह्यातील एकूण ३३५ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित करण्यात आली. संबंधित ३३५ उमेदवारांची अविरोध निवड झाल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर आजच्या निकालाअंती शिक्कामोर्तब झाले आहे.