शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कृषी कल्याण अभियानाच्या अंमलबजावणीची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST

वाशिम: शासनातर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी कल्याण अभियान योजना राबविली जात आहे. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणी पडताळणी करण्यात ...

वाशिम: शासनातर्फे कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी कल्याण अभियान योजना राबविली जात आहे. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणी पडताळणी करण्यात येत असून, या संदर्भात संबंधित सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी उपसंचालकांनी गुरुवारी पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचा समावेश असून, या उपअभियांतर्गत घटक क्रमांक ६ म्हणून कृषी कल्याण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिल्या जातो. या योजनेची प्रगती कशी आहे, अंमलबजावणी नीट होते की नाही, त्याची पडताळणी आता केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी उपसंचालकांनी संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना गुरुवारी पत्र पाठवून योजनेच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.