शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अनलॉकनंतर भाजीपाला महागला; वांग्याचे भाव दुपटीने वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने ...

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. अनलॉकनंतर बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये वांगे अनलॉकपूर्वी २० ते ३० रुपये किलोने विक्री होत होते, ते आता तब्बल ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

अनलॉक प्रक्रियेनंतर बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर महागाईही वाढल्याचे दिसून येत आहे. फळबाजारात फळांचे दर गगनाला भिडले असून, जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. येणारा पावसाळा व खरीप हंगामाची लागणारी लगबग पाहता बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पालक ४० रुपये प्रतिकिलो विक्री होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.

-----------------------

भाजीपाल्याचे दर वाढल्याने दैनंदिन खर्च वाढला आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्याची खरेदी कमी झाली असून, दाळ-वरणाला पसंती देत आहोत. सरकारने लक्ष देऊन वाढलेली महागाई कमी करावी.

- मंगला परळीकर, गृहिणी.

----------------

भाजीपाल्याचे दर अचानक वाढल्याने घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे. भाजीपाल्याचे भाव गगनाला टेकले असून, डाळीवर जोर देत आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहे. महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.

-पुष्पा वानखडे, गृहिणी

-----------------------------------

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक सध्या पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आवक घटल्याने भाव वाढले आहेत.

-प्रदीप निखाडे, व्यापारी

-----------------------------------

ग्रामीण भागात शेतकरी व्यस्त आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढले असून, काही भाजीपाला स्वस्तही झाला आहे.

-गजानन सोनकर, व्यापारी

-------------------------------------------

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

लॉकडाऊनमध्ये भाजीपाला स्वस्त होता. अनलॉक प्रक्रियेनंतर ठोक भाजीपाला वाढणार अशी शक्यता होती. मात्र, काही प्रमाणातच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यामुळे भाडेखर्चही वसूल होत नाही. केवळ वांग्याचे दर वाढल्याने उत्पन्न प्राप्त होत आहे. मात्र, वांग्याचे क्षेत्र कमी आहे. यामध्ये केवळ व्यापाऱ्यांचा फायदा होत असून, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

- अजय दामोदर, शेतकरी