शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाला महागला; वांग्याचे भाव दुपटीने वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने ...

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली. अनलॉकनंतर बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये वांगे अनलॉकपूर्वी २० ते ३० रुपये किलोने विक्री होत होते, ते आता तब्बल ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

अनलॉक प्रक्रियेनंतर बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर महागाईही वाढल्याचे दिसून येत आहे. फळबाजारात फळांचे दर गगनाला भिडले असून, जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. येणारा पावसाळा व खरीप हंगामाची लागणारी लगबग पाहता बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पालक ४० रुपये प्रतिकिलो विक्री होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.

-----------------------

भाजीपाल्याचे दर वाढल्याने दैनंदिन खर्च वाढला आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्याची खरेदी कमी झाली असून, दाळ-वरणाला पसंती देत आहोत. सरकारने लक्ष देऊन वाढलेली महागाई कमी करावी.

- मंगला परळीकर, गृहिणी.

----------------

भाजीपाल्याचे दर अचानक वाढल्याने घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे. भाजीपाल्याचे भाव गगनाला टेकले असून, डाळीवर जोर देत आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहे. महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.

-पुष्पा वानखडे, गृहिणी

-----------------------------------

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक सध्या पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आवक घटल्याने भाव वाढले आहेत.

-प्रदीप निखाडे, व्यापारी

-----------------------------------

ग्रामीण भागात शेतकरी व्यस्त आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढले असून, काही भाजीपाला स्वस्तही झाला आहे.

-गजानन सोनकर, व्यापारी

-------------------------------------------

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

लॉकडाऊनमध्ये भाजीपाला स्वस्त होता. अनलॉक प्रक्रियेनंतर ठोक भाजीपाला वाढणार अशी शक्यता होती. मात्र, काही प्रमाणातच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यामुळे भाडेखर्चही वसूल होत नाही. केवळ वांग्याचे दर वाढल्याने उत्पन्न प्राप्त होत आहे. मात्र, वांग्याचे क्षेत्र कमी आहे. यामध्ये केवळ व्यापाऱ्यांचा फायदा होत असून, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

- अजय दामोदर, शेतकरी