शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भाव कोसळल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आठवडा बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. बाजार बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आठवडा बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. बाजार बंद असल्याने ग्राहक मिळत नाहीत, त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शहरातील बाजारपेठेत कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.

गत आठवड्यापासून कांद्याची आवक वाढली होती. त्यामुळे कांद्याचे भाव १० रुपयांनी कमी झाले. बाजारात नव्याने दाखल झालेल्या ढेमशांचे भाव ५० रुपयांवर गेले आहेत तसेच इतर भाज्यांचे दर कायम आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो, वांगी ३० रुपये किलोवर पोहोचली आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दरही वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, मोसंबी, संत्रे आदी फळांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर गेल्या आठवड्यापेक्षा वाढले आहेत. तसेच महाशिवरात्री उत्सवामुळे साबूदाणा, शेंगदाणे आदींच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. टरबूज व खरबूजची आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.

------------------------------

टरबूज, खरबुजांची आवक वाढली!

गतवर्षी चांगला पाऊस बरसल्याने यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी टरबूज, खरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. साधारणत: जानेवारी महिन्यात टरबुजाची लागवड करण्यात येते; मात्र अनेक शेतकऱ्यांनी लागवड केल्याने टरबुजाची आवक वाढली आहे. टरबूज २० रुपये तर खरबूज ३० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत.

------------------------------------------------------------

टरबुजाची थेट विक्री!

कृषी विभागाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाची थेट विक्री सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी टरबुजाची दुकाने लावली आहेत तसेच इतर भागातही ट्रॅक्टरने माल घेऊन शेतकरी विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे चित्र आहे.

--------------------------------------------------

कांद्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. नव्याने बाजारात आलेल्या भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. इतर भाज्यांचे दर कायम आहेत.

- सागर राऊत, भाजी विक्रेता.