शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

भाजीपाल्याची आवक नाही!

By admin | Updated: June 3, 2017 01:37 IST

अकोल्याची स्थिती : ७० टक्के अडत दुकानदार फिरकले नाही बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकाला हमीभाव मिळावा म्हणून राज्यभरातील शेतकरी १ जूनपासून संपावर गेल्याने अकोल्यातील भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहे. जिल्ह्याशेजारील भाजीपाला आणि सांभार बाजारपेठेत न आल्याने शुक्रवारी सांभार कोथिंबिर दोनशे रुपये किलोच्या भावाने बाजारात विकला गेला. शुक्रवारी पहाटे जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला न आल्याने बाजारपेठेत त्याचा परिणाम जाणवला. शेतकऱ्यांचा माल बाजारात न आल्याने जनता भाजी बाजारातील ७० टक्के अडत दुकानदार शुक्रवारी बाजारात फिरकलेच नाही.गवार शेंगा, टमाटे, दुधी भोपळा, शिमला मिरची, वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी, बीट यांचे भाव ४० रुपये किलो झाले असून, २०० रुपये कि लोच्या दराने सांभाराची विक्री होत असल्याची माहिती भाजी विक्रेता नरेश लोणकर यांनी दिली. अकोल्यातील जनता भाजी बाजारात दररोज मध्यरात्री मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो; मात्र शेतकऱ्यांनी संप छेडल्याने गुरुवारच्या उत्तररात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत एकही गाडी माल घेऊन बाजारात आली नाही. मध्य प्रदेशातील भाजीपाला दररोज अकोल्यात येतो. गुरुवारी रात्री सांभार आणि पत्ताकोबीचा साठा अकोल्यात दाखल झाला; मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे रूप पाहून तेदेखील हादरले आहेत. शुक्रवारी रात्री भाजीपाला न पाठविण्याचा निर्णय मध्य प्रदेशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे. अमरावती येथून पालक, मेथी आणि घोळची भाजी दररोज ४०७ आणि इतर गाड्यांतून येत असते; मात्र अकोल्यापेक्षा जास्त संपाची तीव्रता अमरावतीत असल्याने अमरावती मार्गे येणारा भाजीपाला शुक्रवारच्या पहाटे अकोल्यात पोहोचला नव्हता. त्यामुळे सांभारपाठोपाठ पालक, चवळी, मेथी आदी हिरव्या भाज्यांचे भाव वधारले आहेत. अकोल्याच्या जनता बाजारात भाजीपाल्याचे भाव वधारल्याने गाडी आणि ठेलेवाल्यांनीदेखील त्यापुढची झेप घेतली आहे. अकोल्याच्या बाजारपेठेत दररोज नाशिक, श्रीरामपूर, बुलडाणा, चिखली, पातूर, अकोट, वाडेगाव आदी परिसरातून कारले, वांगी, भेंडी, बरबटी आदी भाजीपाल्यांचा साठा येत असतो; मात्र शुक्रवारी पहाटेपर्यंत हा साठा न पोहोचल्याने ताज्या भाजीपाल्यांची कमतरता बाजारपेठेत जाणवली. ही तीव्रता आंदोलन काही दिवस सुरू राहिल्यास अधिक मोठ्या प्रमाणात जाणवण्याचे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांचा माल गुरुवारच्या मध्यरात्रीपासून येणार नाही, याची कल्पना आल्याने ७० टक्के अडत दुकानकारांनी शुक्रवारी जनता भाजीबाजारात पाऊलदेखील ठेवले नाही.-राजेश ढोमणे, अडत दुकानदार, अकोला.