शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

हरभ-याची भाजी मुंबईच्या मॉलमध्ये

By admin | Updated: December 9, 2014 00:02 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी निवडला व्यवसाय : दररोज होते लाखोंची उलाढाल

बुलडाणा : पावसाअभावी यावर्षी खरिपाचा हंगाम हातचा गेला, तर रब्बी हंगामातही राम उरला नाही. ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या हाताला आतापासूनच काम नाही. त्यामुळे काही मजुरांनी शक्कल लढवून हरभर्‍याची भाजी थेट मुंबईला नेऊन विकण्याचा व्यवसाय हाती घेतला आहे. या तून दोन पैसे हातात येतात व कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. जिल्ह्यातून मुंबईच्या बाजारात गेलेली हीच भाजी आकर्षक पॅकिंग होऊन मॉलमध्ये विकली जाते. यातून दररोज लाखोची उलढाल होत आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा ही दोन पिके हमखास घेतली जातात. पाणी नसले तरी हरभरा पीकये ते. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही शेतकरी हरभरा पिक घेतात. हरभरा उगवल्यावर काही दिवसानंतर हरभर्‍याच्या झाडांचे शेंडे खुडावी लागतात. शेंडे खुडले की, झाडाच्या इतर फांद्यांची वाढ होऊन झाडे डेरेदार बनते. खुडलेले शेंडे कोवळे असल्यामुळे त्याची भाजी चवदार लागते. शेतकरी मजूर लावून ही भाजी खुडून घेतात. या हरभर्‍याच्या भाजीच्या विक्रीतून दोन पैसे जादा यावेत म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील काही महिलांनी या भाजीला मुंबईचे मार्केट दाखविले आहे. शेतकर्‍यांचा माल रात्रीच्या रेल्वेने मुंबईला न्यायचा. दिवसभर भाजीबाजारात ही भाजी विकायची आणि पुन्हा सायंकाळी रेल्वेत बसून दुसर्‍या दिवशी परत गावी यायचे. असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. सध्या काही खेडे विभागातून मजूर हा व्यवसाय करीत आहेत. या भाजी व्यवसाया तून एक महिलेस दिवसाकाठी किमान हजार ते बाराशे रुपये मजुरी मिळत आहे. साधारण आठ ते पंधरा दिवसांचा हा व्यवसाय आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी हा व्यवसाय करीत असून, यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.