शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

अमरावतीत ४ जानेवारी रोजी तिसरे अ.भा. वऱ्हाडी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:34 IST

साहित्य संमेलनाचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता होणार आहे.

अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. उद्धव शेळके साहित्य नगरी अमरावती मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्व. मनोहर तल्हार विचारपीठ दृक श्राव्य सभागृहात शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी करण्यात येणार आहे. तिसऱ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावतीचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर राहणार असून संमेलनाच्या संमेलन अध्यक्ष पदी जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक नरेंद्र इंगळे यांची निवड झाली आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता होणार आहे. उदघाटन सत्राला मावळते संमेलन अध्यक्ष प्रकाश पोहरे, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष शिरीष धोत्रे, जेष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे, मुंबईच्या वऱ्हाडी साहित्यिका अनुराधाताई धामोडे, दैनिक सकाळ अकोला वऱ्हाड आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, प्रा. सदाशिव शेळके, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे अध्यक्ष श्याम ठक आणि गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा. मोना चिमोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन सत्राचे संचालन डॉ. हेमंत खडके करणार आहेत. साहित्य संमेलनामध्ये 'संस्कृती संवर्धनासाठी बोली भाषेचे उपयोजन' या विषयावर परिसंवाद, वऱ्हाडी कथाकथन, कवी संमेलन, वऱ्हाडरत्न पुरस्कार वितरण, वऱ्हाडातील दुर्मिळ वस्तूंची वाम प्रदर्शनी, कु. पल्लवी संजय नेमाडे यांची चित्र प्रदर्शनी अशा कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यावेळी संमेलन विशेषांक वाणीचा हूरळा, युवा समीक्षक प्रा. महादेव लुले यांचा निवडक अर्वाचीन वऱ्हाडी कवितांवरील समीक्षा ग्रंथ 'रई', जेष्ठ वऱ्हाडी साहित्यिक शिवलिंग काटेकर यांचा 'वऱ्हाडधन' या वऱ्हाडी शब्दकोशाची पाचवी आवृती, साहित्यिक दयाराम निंबोळकर यांची एकांकिका 'सात बारा कोरा', कवी अरुण विघ्ने यांचा 'जागल' कवितासंग्रह अशा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचाचा मानाचा 'वऱ्हाड रत्न पुरस्कार २०२०' महेंद्र राऊत मुंबई तथा डॉ. विलास सवई यांना प्रदान करण्यात येणार आहे. अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिका देवका ताई देशमुख यांना वऱ्हाडी जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यलाई पुरस्कार २०२० हा वऱ्हाडी बोली भाषेत उल्लेखनीय लिखाण करणारे युवा साहित्यिक उज्वल विभुते यांना प्रदान करण्यात येणार आहे. समारोपीय सत्रामध्ये संमेलनाचा समारोप संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आबासाहेब कडू, ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, डॉ. ममता इंगोले, दयाराम निंबोळकर, तेजस्वी बारब्दे यांच्या उपस्थितीत होणार आहे. वऱ्हाडी बोली भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाने या आधी दोन वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. दुसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाला मसाला किंग धनंजय दातार दुबई यांच्यासह भारत गणेशपुरे या कलावंताची उपस्थिती लाभली होती. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचा 'चिरांगण' हा वऱ्हाडी दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होत असतो. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचातर्फे 'कानोसा' हे वऱ्हाडी न्युज पोर्टल तथा 'वऱ्हाडधन' हे वऱ्हाडी शब्दकोश अँप चालवले जाते. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच कथाकथन कार्यशाळा, वऱ्हाडी लेखन कार्यशाळा, प्रातिनिधिक कवितासंग्रह, संवाद लेखन कार्यशाळा, बोली भाषेवर आधारित चर्चासत्रे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. तिसऱ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलना च्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. श्याम ठक यांची कार्याध्यक्षपदी तर डॉ. मोना चिमोटे यांची आयोजन समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रा. मनोज तायडे, डॉ. प्रा. माधव पुठवाड, डॉ. प्रा. हेमंत खडके, डॉ. प्रा. प्रणव कोलते, पुष्पराज गावंडे, सदाशिव शेळके, दयाराम निंबोळकर, रवींद्र दळवी, महादेव लुले, निलेश कवडे यांच्यासह अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंचाचे सदस्य परिश्रम घेत आहेत. अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते. अशा अंबानगरीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तर्फे वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वऱ्हाडी बोलीभाषा संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने विद्यापीठा चे साहित्यिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. या वऱ्हाडी साहित्य संमेलनाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घेण्याचे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी विभाग तथा अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचा च्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्य