शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

व-हाडवीरांनी लढला हैदराबादमुक्तीचा लढा

By admin | Updated: September 17, 2014 01:32 IST

दिन विशेष : धाड परिसरातील गावांतील युवकांनी घेतला होता उत्स्फरुत सहभाग.

सज्रेराव देशमुख / धाड देश स्वतंत्र होऊनही संस्थानिकांची सत्ता अबाधित होती, असाच प्रकार हैदराबाद संस्थानमध्ये होता. येथील प्रांताचा सत्ताधिश चाऊस रझाकार यांच्या उपद्रवाने त्रस्त झालेल्या मराठवाड्यातील जनतेच्या रक्षणासाठी वर्‍हाड प्रांतातील सीमारेषेवरील असलेल्या गावांमधून मोठय़ा प्रमाणात तरूण स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झाले होते. अनेकांनी ऐनतारूण्यात देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावले. धाड परिसरातील धामणगाव, सातगाव म्हसला, धाड येथील स्वातंत्र्य सैनिकांचा त्यात समावेश असून, आज धाड येथील लक्ष्मणराव मिसाळ गुरूजी हे एकमेव स्वातंत्र्यसैनिक वयाच्या ९८ व्या वर्षी लढय़ाचा जोषपूर्ण इतिहास सांगताना रोमांचित होतात.धाड परिसरातील विविध गावांमध्ये हैदराबाद संस्थानचा चाऊस रझाकारचा उपद्रव असह्य झाल्यामुळे तत्कालीन तरूणांनी स्वत:ला स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिले. धामणगाव येथील रमेश पाटील, सातगाव म्हसला येथील जुलालसिंग राजपूत, रामराव पालकर, तर धाड येथील शंकर जाधव, लक्ष्मण जगताप या वर्‍हाडवीरांनी हैदराबाद लष्करावर हल्ला करणे, हैदराबाद पोलिसांविरूद्ध कारवाया करणे यासाठी वर्‍हाडातील गिरडा, जांभोरा, देऊळगाव राजा येथे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून रझाकराविरूद्ध लढाईत तरूणांनी देशभक्ती पणाला लावली. रझाकरांनी वर्‍हाडात येणार्‍या आणि वर्‍हाडातून मराठवाड्यात जाणार्‍या प्रत्येक बैलगाडी, वाहने आणि व्यक्तींवर अन्यायकारक कर आकारणी केली होती. त्यासाठी सीमारेषेवरील रस्त्यावर नाके उभारले होते. आजही कनेरगाव, वरूड, पद्मावती येथे नाके इमारती आहेत. जुल्मी शासनाला धडा शिकवण्यासाठी धामणगाव आणि पारध रस्त्यावरील धामणा नदीत गस्त घालणार्‍या हैदराबाद पोलिसांवर वीर वामनराव लोखंडे यांच्या नेतृत्वात धामणगावच्या रमेश पाटील व सहकार्‍यांनी हल्ला करून त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली. उसाच्या शेतातून दगडफेक करून पिटाळून लावले. स्वा तंत्र्यदिनी पद्मावती नाक्यावर राष्ट्रध्वज फडकवला. अशा अनेक राष्ट्रप्रेमी घटनांनी लक्ष्मणराव मिसाळ गुरूजींनी लढय़ाच्या आठवणी ताज्या केल्या.