शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकांचा केवळ वापर वाढला, प्रत्यक्षात तणनियंत्रण कमी!

By admin | Updated: July 4, 2014 00:43 IST

रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्‍यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे.

अकोला: कीडींचा प्रादुर्भाव किंवा रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्‍यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. गतवर्षी ९२ टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकासाठी तणनाशकांचा वापर केला; परंतु तणनाशकांची नेमकी मात्रा न दिल्याने ८६ टक्के शेतकर्‍यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे. तणांमुळे पिकांचे होणारे नुकसान, मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. त्यांच्या या शिफारशींना संयुक्त संशोधन आढावा परिषदेची मान्यताही मिळाली आहे. त्यासाठी या विद्यापीठाने गतवर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता तालुके व गावं निवडण्यात आली होती. तणनाशके वापरासंबंधी असलेले ज्ञान, त्याचा अवलंब आदींबाबत या शेतकर्‍यांकडून माहिती घेण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या २४0 शेतकर्‍यांपैकी गतवर्षी २२१ (९२ टक्के ) शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकामध्ये तणनाशकांचा वापर केल्याचे आढळून आले. आठ वर्षांपूर्वी केवळ ५ टक्के शेतकरी तणनाशकांचा वापर करीत होते. ४२ टक्के शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय नसल्याचे या अभ्यासात आढळून आले असून, ७ टक्के शेतकर्‍यांना हेक्टरी २१ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन झाल्याचे समजले. २२ टक्के शेतकर्‍यांनी पीक कर्ज घेतले नव्हते. ४२ टक्के शेतकर्‍यांनी फवारणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. ४0 टक्के शेतकर्‍यांकडे बैलजोडी नव्हती, १७ टक्के शेतकर्‍यांकडे स्वत:चे ट्रॅक्टर होते. गतवर्षी प्रथमच १४ टक्के शेतकर्‍यांनी तणनाशकाचा वापर केला. ९0 टक्के शेतकर्‍यांनी तणनाशक तंत्रज्ञान पिकांसाठी वरदान असल्याची भूमिका मांडली. तणनाशक कसे वापरावे, मात्रा किती असावी, याबाबत शेतकर्‍यांमध्ये ज्ञानाचा अभाव जाणून आला.