शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

चढ-उतारातूनच आयुष्य समृद्ध होते- सावजी

By admin | Updated: September 5, 2016 02:48 IST

जीवनातील अनुभवातून जिवन अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन डॉ. अविनाश सावजी यांनी केले.

अकोला, दि. ४ : कधी काळी जेव्हा सायकलीने फिरायचो तेव्हा मार्गावर अनेक ठिकाणी चढ-उतार अनुभवाला यायचे. चढाव आला की जोर लावून पायडल मारायचो, त्यानंतर उतार आला की, हायसे वाटायचे. याचे तेव्हा काही नवल नव्हते; मात्र आता त्या चढ-उताराचे महत्त्व जाणवते. मार्गातील चढ-उताराच्या अनुभवातून धडे मिळतात, आयुष्य अधिक समृद्ध होते, असे प्रतिपादन प्रयास सेवा अंकुर या अमरावती येथील सामाजिक संस्थेचे संचालक डॉ. अविनाश सावजी यांनी केले. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित प्रख्यात अस्पायर शैक्षणिक संस्थेच्या आठव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. दुसरे प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष पी.नाथ दंदे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ऐश्‍वर्या सहस्त्रबुद्धेच्या स्वागत गीताने झाली. अल्पावधीतच अकोल्यातून देश-विदेशात कीर्ती मिळविलेल्या अस्पायरची माहिती संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे यांनी प्रास्ताविकतेतून दिली. अस्पायरमध्ये सवरेत्कृष्ट सिद्ध झालेल्या १६ विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वर्षातील सवरेकृष्ट विद्यार्थिनी प्रशांती बाठी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. सावजी म्हणाले की, आयुष्यातील चढ-उताराला घाबरण्यापेक्षा त्यातून धडा घेत घडले पाहिजे. ओक हॉल उभे राहण्यासाठीदेखील जागा नव्हती, एवढी गर्दी झाली होती. कॅन्सर पीडित शहादीदी नामक गरजवंत महिलेसाठी स्वत:च्या खिशातून साडेतीन लाख रुपये खर्च करणारे डॉ.पी. नाथ दंदी यांनी भाषणातून पर्यावरणावपर भर दिला. वनराईच्या उपक्रमाची माहितीही त्यांनी येथे दिली. रुग्णसेवेतून माणसे जोडण्याची माहितीही त्यांनी येथे दिली. जीवनाचे विचार सकारात्मक करण्याच्या दिशेने प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अस्पायरचे कौतुक केले. आत्महत्या होत असलेल्या या परिसरात नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य अभिमानास्पद आहे. अशैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणार्‍या या संस्थेने सकारात्मक विचार आणि आत्मविश्‍वास पेरण्याचे कार्य केले, असे ते म्हणालेत. कार्यक्रमात अस्पायरच्या आठ वर्षातील बुलेटीनच्या वाचनातून संस्थेच्या प्रगतीच्या टप्प्यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा कुळकर्णी आणि रोशनी जेठानी यांनी केले.