शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्नई बंधारा ‘ओव्हर फ्लो’; ६४ गावांचे जलसंकट टळले

By admin | Updated: August 10, 2015 01:38 IST

बंधा-यात दोन महिने पुरेल एवढे पाणी.

अकोला: गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या अतवृष्टीमुळे खांबोराजवळील उन्नई बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दोन महिने पुरेल एवढे पाणी बंधार्‍यात उपलब्ध झाल्याने, ६४ गावांमध्ये निर्माण होणारे जलसंकट टळले आहे. अकोला तालुक्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध होता. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणातील अत्यल्प जलसाठा गत जानेवारीमध्ये शहरासाठी राखीव करण्यात आला होता. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये गत फेब्रुवारीपासून १0 ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, या गावांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गत सोमवारपर्यंत महान येथील काटेपूर्णा धरणात केवळ सहा टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे आणखी काही दिवस धरणातील जलसाठय़ात वाढ न झाल्यास दोन महिन्यांत अकोला शहरासह ६४ गावांमध्ये जलसंकटाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. दरम्यान, गत मंगळवार व बुधवारी जिल्ह्यात अतवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आले. त्यामध्ये महान धरणातील जलसाठय़ात वाढ झाली, तसेच खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या बंधार्‍यातून पाण्याची उचल केली जाते, तो खांबोरा जवळील उन्नई बंधारादेखील पूर्णत: भरला असून तो १६0 फूट लांब आणि चार मीटर खोल आहे. ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दोन महिने पुरेल एवढे पाणी उन्नई बंधार्‍यात उपलब्ध झाल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमध्ये निर्माण होणारी जलसंकटाची परिस्थिती तूर्त टळली आहे.