शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

आयुक्तांवर अविश्‍वासाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:39 IST

अकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्‍यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या चर्चेला बळ मिळत असून, सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकही अविश्‍वास प्रस्तावासाठी सरसावल्याची माहिती आहे.  

ठळक मुद्देमहापालिका सत्ताधार्‍यांसह विरोधकही सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्‍यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या चर्चेला बळ मिळत असून, सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकही अविश्‍वास प्रस्तावासाठी सरसावल्याची माहिती आहे.  आयुक्त अजय लहाने स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत  सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांसोबत त्यांचे खटके उडाले. सत्ताधारी भाजपातील गटबाजीचाही त्यांना सामना करावा लागला. विजय अग्रवाल यांनी महापौर पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी व नंतरही काही दिवस अग्रवाल व आयुक्त लहाने यांचे फारसे पटत नव्हते. काही कालावधीनंतर मात्र सर्व काही सुरळीत झाल्यामुळे की काय, ‘अमृत’ योजनेंतर्गत ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना, ७९ कोटींची भूमिगत गटार योजना निकाली काढण्यावर महापौर अग्रवाल आणि आयुक्त लहाने यांच्यात एकमत झाले. दोन्ही योजनांना मंजुरी देण्यास शासन सकारात्मक असल्याचे दिसताच पुन्हा एकदा आयुक्त अजय लहाने यांच्या विरोधातील राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकार्‍यांनी स्वपक्षीय नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांना एकत्र करीत आयुक्त लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत बैठक पार पडणार असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती आहे. 

मनपात संभ्रमाची स्थिती- मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणार्‍या ‘स्थापत्य’ कन्सल्टन्सीचा विषय असो किंवा अमृत योजनेतील ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना किंवा ७९ कोटींच्या भूमिगत गटार योजनेची मंजुरी व अंमलबजावणीच्या मुद्यावर खुद्द भाजपातच अंतर्गत कलह आहेत. - सत्ताधार्‍यांच्या चुकीवर बोट ठेवण्याची जबाबदारी असणार्‍यांविरोधी पक्षाच्या तंबूत कमालीची शांतता आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवक कोणाबद्दल काय बोलतील, अन् काय निर्णय घेतील,याविषयी अविश्‍वासाचे वातावरण आहे. त्यामुळे तूर्तास तरी महापालिकेत संभ्रमाची स्थिती आहे.