शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

आयुक्तांवर अविश्‍वासाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:39 IST

अकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्‍यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या चर्चेला बळ मिळत असून, सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकही अविश्‍वास प्रस्तावासाठी सरसावल्याची माहिती आहे.  

ठळक मुद्देमहापालिका सत्ताधार्‍यांसह विरोधकही सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्‍यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या चर्चेला बळ मिळत असून, सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकही अविश्‍वास प्रस्तावासाठी सरसावल्याची माहिती आहे.  आयुक्त अजय लहाने स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत  सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांसोबत त्यांचे खटके उडाले. सत्ताधारी भाजपातील गटबाजीचाही त्यांना सामना करावा लागला. विजय अग्रवाल यांनी महापौर पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी व नंतरही काही दिवस अग्रवाल व आयुक्त लहाने यांचे फारसे पटत नव्हते. काही कालावधीनंतर मात्र सर्व काही सुरळीत झाल्यामुळे की काय, ‘अमृत’ योजनेंतर्गत ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना, ७९ कोटींची भूमिगत गटार योजना निकाली काढण्यावर महापौर अग्रवाल आणि आयुक्त लहाने यांच्यात एकमत झाले. दोन्ही योजनांना मंजुरी देण्यास शासन सकारात्मक असल्याचे दिसताच पुन्हा एकदा आयुक्त अजय लहाने यांच्या विरोधातील राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकार्‍यांनी स्वपक्षीय नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांना एकत्र करीत आयुक्त लहाने यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत बैठक पार पडणार असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती आहे. 

मनपात संभ्रमाची स्थिती- मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणार्‍या ‘स्थापत्य’ कन्सल्टन्सीचा विषय असो किंवा अमृत योजनेतील ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना किंवा ७९ कोटींच्या भूमिगत गटार योजनेची मंजुरी व अंमलबजावणीच्या मुद्यावर खुद्द भाजपातच अंतर्गत कलह आहेत. - सत्ताधार्‍यांच्या चुकीवर बोट ठेवण्याची जबाबदारी असणार्‍यांविरोधी पक्षाच्या तंबूत कमालीची शांतता आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवक कोणाबद्दल काय बोलतील, अन् काय निर्णय घेतील,याविषयी अविश्‍वासाचे वातावरण आहे. त्यामुळे तूर्तास तरी महापालिकेत संभ्रमाची स्थिती आहे.