शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह ...

अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला असून, वादळवाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला वर्गीय पिकांना बसला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, रविवार व सोमवारी काही भागात हलक्या स्वरूपात सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. या पावसामुळे साथरोग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व अवकाळी पाऊस या दुहेरी संकटामुळे सामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास ३० मिनिटे ते एक तास वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारांसह झालेल्या पावसाने शहर आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग झोडपून काढला. मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

------------------------------

या भागात अवकाळी पावसाची हजेरी

जिल्ह्यतील ग्रामीण भागात बुधवारी वादळ वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये पातूर, बाभूळगाव, आलेगाव, लोहारा, तेल्हारा शहर व तालुका, पंचगव्हाण, मूर्तिजापूर, विवरा, बेलखेड आदी भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पातूर तालुक्यातील मळसूर येथे काही प्रमाणात गारपीट झाली.

---------------------------

वणी वारुळा परिसरात पिकांचे नुकसान

अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून, परिसरातील आंबा, कांदा, गहू व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे मत वणी येथील शेतकरी भगीरथ पोटे, सोनबर्डी येथील बाळू पाटील आवारे यांनी व्यक्त केले.

------------------------------

मळसूर परिसरात गारपीट

पातूर तालुक्यातील मळसूरसह परिसरात बुधवारी गारपीटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कांदा, केळी, उन्हाळी मूग, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. फळबाग, लिंबू, आंबा आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गत दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.