शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह ...

अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला असून, वादळवाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला वर्गीय पिकांना बसला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, रविवार व सोमवारी काही भागात हलक्या स्वरूपात सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. या पावसामुळे साथरोग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व अवकाळी पाऊस या दुहेरी संकटामुळे सामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास ३० मिनिटे ते एक तास वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारांसह झालेल्या पावसाने शहर आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग झोडपून काढला. मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

------------------------------

या भागात अवकाळी पावसाची हजेरी

जिल्ह्यतील ग्रामीण भागात बुधवारी वादळ वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये पातूर, बाभूळगाव, आलेगाव, लोहारा, तेल्हारा शहर व तालुका, पंचगव्हाण, मूर्तिजापूर, विवरा, बेलखेड आदी भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पातूर तालुक्यातील मळसूर येथे काही प्रमाणात गारपीट झाली.

---------------------------

वणी वारुळा परिसरात पिकांचे नुकसान

अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून, परिसरातील आंबा, कांदा, गहू व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे मत वणी येथील शेतकरी भगीरथ पोटे, सोनबर्डी येथील बाळू पाटील आवारे यांनी व्यक्त केले.

------------------------------

मळसूर परिसरात गारपीट

पातूर तालुक्यातील मळसूरसह परिसरात बुधवारी गारपीटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कांदा, केळी, उन्हाळी मूग, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. फळबाग, लिंबू, आंबा आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गत दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.