शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह ...

अकोला : जिल्ह्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारी हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला असून, वादळवाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला वर्गीय पिकांना बसला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, रविवार व सोमवारी काही भागात हलक्या स्वरूपात सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने वादळवाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. या पावसामुळे साथरोग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व अवकाळी पाऊस या दुहेरी संकटामुळे सामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास ३० मिनिटे ते एक तास वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारांसह झालेल्या पावसाने शहर आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग झोडपून काढला. मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

------------------------------

या भागात अवकाळी पावसाची हजेरी

जिल्ह्यतील ग्रामीण भागात बुधवारी वादळ वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये पातूर, बाभूळगाव, आलेगाव, लोहारा, तेल्हारा शहर व तालुका, पंचगव्हाण, मूर्तिजापूर, विवरा, बेलखेड आदी भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पातूर तालुक्यातील मळसूर येथे काही प्रमाणात गारपीट झाली.

---------------------------

वणी वारुळा परिसरात पिकांचे नुकसान

अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले असून, परिसरातील आंबा, कांदा, गहू व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, असे मत वणी येथील शेतकरी भगीरथ पोटे, सोनबर्डी येथील बाळू पाटील आवारे यांनी व्यक्त केले.

------------------------------

मळसूर परिसरात गारपीट

पातूर तालुक्यातील मळसूरसह परिसरात बुधवारी गारपीटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कांदा, केळी, उन्हाळी मूग, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. फळबाग, लिंबू, आंबा आदी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गत दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.