शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST

तेल्हारा : शहरासह तालुक्यात रविवारी (दि. १३) अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतित ...

तेल्हारा : शहरासह तालुक्यात रविवारी (दि. १३) अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा व तुरीच्या पिकांवर अळींचे आक्रमण वाढणार असल्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

सततचा पाऊस व परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. रब्बी हंगामातील पिकाची आशा असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकाची पेरणी केली. सध्या हरभऱ्याचे पीक बहरलेले असताना गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभऱ्यावर अळींचे आक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित असून, फवारणीच्या कामांना वेग आला आहे. परिसरात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

--------------

तापमानात घट; आरोग्य धोक्यात

तेल्हारा शहरात १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने परिसरातील तापमानात घट झाली आहे. वातावरणात अचानक बदला झाल्यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.