शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अवकाळीच्या पावसाचा तडाखा, सहा मेंढ्या ठार; २४ तासांत सरासरी ३२.६ मिमी पाऊस

By रवी दामोदर | Updated: November 27, 2023 18:08 IST

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते.

अकोला : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार रविवार, दि. २६ नोव्हेंबर व सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दोन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा जिल्ह्याला बसला आहे. गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३२.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसात रात्रभर भिजल्याने बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळनजीक असलेल्या खरबी शिवारात सहा मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर पाऊस सक्रिय झाला असून, रविवारी रात्री सातही तालुक्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरला तर वेचणी राहिलेल्या शेतातला कापूस ओला झाला. शिवाय ढगाळ वातावरण व पावसामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली. भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.वातावरणातील बदलाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी आलेली आहे. अशातच रविवारी रात्री १२ ते साडेबारा वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

मृतक मेंढ्यांचा झाला पंचनामा

बाळापूर तालुक्यातील कसुरा साझामधील टाकळी खोजबळनजीक असलेल्या खरबी शिवारात अवकाळी पावसामुळे सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच महसुल विभागाच्या तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील शालीग्राम तुकाराम बिचकुले यांनी स्वत:च्या मालकीच्या मेंढ्या खरबी शिवारात बसविल्या होत्या. रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पाच मेंढ्या व एक पिल्लू अशा सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बिचकुले यांनी पशुंचा विमा काढलेला नसल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे. 

टॅग्स :Akolaअकोला