शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

जिल्ह्यात अवकाळी पाऊस; पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST

अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यापावसात मुर्तिजापूर तालुक्यातील भाजीपाला, कांदा आणि उन्हाळी तीळ ...

अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यापावसात मुर्तिजापूर तालुक्यातील भाजीपाला, कांदा आणि उन्हाळी तीळ पिकाचे नुकसान झाले, तर इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पिकांना फटका बसला. शनिवारीदेखील सायंकाळच्या सुमारास अकोला शहरासह मुर्तिजापूर, बार्शिटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही निदर्शनास आले. अकोला शहरातही काही भागात गारपीट झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, याचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

मुर्तिजापूरात ७.३ हेक्टरवर नुकसान

शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे मुर्तिजापूर तालुक्यात ७.३ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये कांदा, उन्हाळी तीळ आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारीदेखील अवकाळी पावसामुळे तालुक्यातील इतरही भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

डाबकी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

शुक्रवारी वादळवाऱ्यासह झालेल्या पावसानंतर शुक्रवारी रात्री उशिरा डाबकी परिसरात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात गारपीट

जिल्ह्यातील बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात शनिवारी अवकाळी पावसासोबतच गारपीटही झाली. बाळापूर तालुक्यातील वाडेगावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कृषी विभागाच्या सर्वेक्षणानंतरच नुकसानाचा आकडा समोर येणार आहे.

शुक्रवारी झालेल्या पावसात मुर्तिजापूर तालुक्यात ७.३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये भाजीपाला, कांदा आणि तीळ पिकांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले हे सर्वेक्षणानंतरच समोर येईल.

- डॉ. के.बी. खोत, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला